शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दिवसात सात रुग्णांचा जातो जीव

By समीर देशपांडे | Published: October 04, 2023 1:16 PM

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एका दिवसात २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

समीर देशपांडेकोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) एका सप्टेंबर महिन्यात २२८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल २९ बालकांचाही समावेश आहे. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एका दिवसात २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे हे चित्र समोर आले आहे. मात्र, या ठिकाणी औषधांची टंचाई नसल्याचे तसेच यातील ६५ मृत्यू हे रुग्ण दाखल झाल्यापासून २४ तासांतील असल्याचेही सांगण्यात आले.राज्यात याआधी नागपूर, नाशिक आणि आता नांदेड येथे रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीपीआर रुग्णालयातही सप्टेंबर महिन्यात असा एकही दिवस गेलेला नाही की, ज्या दिवशी मृत्यू झालेला नाही. याची वेगवेगळी कारणे आहेत. या २२८ मृतांपैकी ६५ जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या २४ तासांतच झालेला आहे.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यांतील शासकीय रुग्णालयातून, कोल्हापूर, इचलकरंजीसह मोठ्या शहरांमधील खासगी रुग्णालयांमधून तिथे उपचार करणे थांबले की मग अतिगंभीर रुग्णांना सीपीआरला पाठवले जाते. या रुग्णांची आधीच्या रुग्णालयात प्रकृती न सुधारता ती खालावत चालल्याने सीपीआरला पाठवले जाते. काही वेळा काही रुग्णांची आर्थिक परिस्थितीही नाजूक असल्याने नातेवाईक अशांना सीपीआरमध्ये दाखल करतात. या ठिकाणचे उपचार मोफत असल्याने त्याचाही फायदा झाला तर झाला असाही एक विचार असतो. परंतु, असे अतिगंभीर रुग्ण बहुतांशी वेळा मृत्यू पावतात.या २२८ मृत रुग्णांमधील १६३ रुग्ण हे २४ तासांनंतर मृत्यू पावलेले आहेत. अनेक आजारी, वयस्कर रुग्णांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतात. अशा १६३ जणांचा महिन्याभरात मृत्यू झाला आहे. कमी वजनाची बाळे हा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा प्रश्न असून, सप्टेंबर २०२३ मध्ये अशा २९ बालकांचा मृत्यू झाला आहे. वजन अतिशय कमी असणे, जन्मताच बाळाला श्वासोच्छवासाचा त्रास होणे अशा अनेक कारणांमुळे या बालकांचा मृत्यू झाला आहे.

सीपीआरमधील ज्या रुग्णांचे मृत्यू झाले आहेत ते २२८ सर्व रुग्ण हे अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेणारे होते. सर्वसाधारण वॉर्डमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. औषधसाठा पुरेसा आहे. अतिगंभीर रुग्णांना आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात सीपीआरमध्ये दाखल केल्यामुळेही मृतांची संख्या जास्त आहे. - डॉ. प्रकाश गुरव, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयDeathमृत्यू