शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रेल्वेतील ‘फुकट्यां’ना सात कोटींचा दंड : नऊ महिन्यांत सव्वालाख जणांचा विनातिकीट प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:38 IST

मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत

ठळक मुद्देपुणे विभागाची कारवाई ; मोहीम आणखी तीव्र करणार

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत, तिकीट तपासनिसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास करताना एक लाख २८ हजार लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारला.

वेळेत आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे वर्षाकाठी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. काही मार्गांवरील ठरावीक गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्याचा फायदा घेत, तिकीट तपासनिसांची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मुख्यत: कमी अंतराच्या व कमी तिकिटाच्या प्रवासातच तिकीट न घेता प्रवास करण्याची मानसिकता जास्त आहे. गर्दीत हळूच बाकावर जाऊन बसणे, तिकीट तपासनीस आल्यावर दुसºया डब्यात जाणे, स्टेशन आल्यावर तत्काळ खाली उतरणे असे प्रकार करून तिकीट चुकविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पुणे विभागाने विशेष मोहीम राबविली.

मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत, ज्यातून सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उपविभागीय रेल्वे प्रबंधक, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधकांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, साहाय्यक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. सुभाष यांच्या निरीक्षणाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबविली.

 

  • गेल्यावर्षीपेक्षा दंडात १५ टक्क्यांनी वाढ

पुणे विभागाकडून मागील वर्षाच्या याच कालावधीत दोन लाख ५० हजार प्रकरणांत १२ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामध्ये एक लाख १३ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून सहा कोटी २४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल झाला होता. विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या एकूण रकमेमध्ये दंडात १५ टक्के वाढ झाली. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

 

प्रशासनाकडून तिकीट तपासणी नियमितपणे सुरू असते. गेल्या नऊ महिन्यांत एक लाख २८ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास संबंधित प्रवाशाला आर्थिक दंड व मानहानीस सामोरे जावे लागते. कायद्यांतर्गत दंड भरावा लागतो आणि पैसे न दिल्यास त्यांना तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेPuneपुणेSangliसांगली