शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना हरवलं अन् तिथेच आवाडेंचं ठरलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 3:42 PM

लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते.

ठळक मुद्देधैर्यशील यांच्या विजयात आवाडे यांच्या बंडाची बीजेराहुल आवाडेंचा दबाव : लोकसभेपासूनच सुरू होत्या हालचाली

विश्र्वास पाटील कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद सदस्य असलेला त्यांचा मुलगा राहुल यांचाच दबाव जास्त होता. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे पुढे आले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने हे विजयी झाल्यापासूनच आवाडे गटात जास्त अस्वस्थता होती. त्याचीच परिणती पक्ष सोडण्यात झाली आहे. आवाडे गटाच्या राजकारणात राहुल यांचा शब्द आता कोण डावलू शकत नाही, हेच त्यामागील खरे कारण आहे.लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते. त्यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून धैर्यशील माने, निवेदिता माने, आदी विविध नावांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी राहुल आवाडे यांचा शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न होता.

मी शिवसेनेत जाऊन शेट्टी यांच्याविरोधात लढतो, असा त्यांचा कुटुंबातही टोकाचा आग्रह होता. त्यांनी शेट्टी यांच्याविरोधात त्यावेळी अर्जही दाखल केला होता. त्यावेळी त्यांचा अर्ज माघार घेताना आवाडे कुटुंबीयांना नाकीनऊ आले होते; परंतु त्याच्या काही दिवसच आधी प्रकाश आवाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती आणि आवाडे घराण्याचे काँग्रेसशी इतक्या वर्षांचे संबंध आहेत. शिवाय त्यांचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शेट्टी यांच्याशीही चांगले संबंध तयार झाले होते. त्यामुळे कुटुंबातूनच राहुल यांना पाठबळ मिळाले नाही.

पुढच्या राजकारणात धैर्यशील माने यांना ही संधी मिळाली व ते लाटेवर स्वार होऊन खासदार बनले. त्यानंतर मात्र राहुल यांची चिडचिड जास्त वाढली. ‘तुमच्यामुळेच माझा खासदारकीचा हातातोंडाचा घास गेला,’ असे राहुल यांचे म्हणणे होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा वडिलांवर काँग्रेस सोडण्याचा दबाव होता. तो लोकसभेला नाही, परंतु किमान विधानसभेच्या अगोदर तरी यशस्वी झाला.आवाडे नकोत की हात?राहुल यांनीच गेल्या महिन्यात इचलकरंजीत तीन टीम नेमून घरोघरी सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये ‘आम्हांला आवाडे हवेत; परंतु तुमचे हात चिन्ह नको अशी बहुतांश लोकांनी सांगितल्याचे आवाडे यांचे म्हणणे होते.

नव्या पिढीला हात चिन्हावर मते द्यायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हे चिन्ह घेऊ नका, असा निर्णय झाला. चिन्ह घ्यायचे नाही तर पक्षात राहून अपक्ष म्हणून लढता येणार नाही म्हणून त्यांनी शेवटी काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीला आवाडे नकोत की हात नको याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर