शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राजारामपुरीत विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 19:39 IST

राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार झाला.

कोल्हापूर - राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. समर्थ अविनाश चौगुले (वय ११) असे त्याचे नाव आहे. बाहेरुन तुटून आलेला पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. तो काढण्याचा मोह अखेर समर्थच्या जिवावर बेतला. दिवाळी सणाच्या तोंडावर शनिवारी दूपारी चारच्या सुमारास घडलेल्या दूर्घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी, समर्थ चौगुले हा सहावी मध्ये शिकत होता. वडील मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. आई पुजा कपड्याच्या दूकानात नोकरी करते. लहान भाऊ शुभम हा शाळेला असतो. दिवाळी सुट्टीमुळे शनिवारी घरी आजोबा आणि दोघे भावंडे होते. समर्थच्या घरासमोर विजेचा खांब आहे. तेथून ११ हजार व्होल्टची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यावर बाहेरुन तुटून आलेला पतंग अडकला होता. त्यावर समर्थची नजर पडताच तो पतंग खाली काढण्यासाठी धडपडू लागला. उंचावर असल्याने सहजासहजी काढता येत नव्हता. त्यामुळे समोरच्या भोरे यांच्या दूमजली घराच्या गच्चीवर तो चढला. हात पोहचत नसल्याने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना विद्युत वाहिनीला पाईचा स्पर्श होताच त्याला जोराचा धक्का बसला. पंधरा फुट उंचावरुन तो खाली कोसळून बेशुध्द पडला.गल्लीमध्ये हा प्रकार लक्षात येताच लोकांनी त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समर्थचे आई-वडील कामावर गेले होते. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांचा अक्रोश ºहदय पिळवटून टाकणारा होता. राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू