शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

राजारामपुरीत विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 19:39 IST

राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार झाला.

कोल्हापूर - राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. समर्थ अविनाश चौगुले (वय ११) असे त्याचे नाव आहे. बाहेरुन तुटून आलेला पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. तो काढण्याचा मोह अखेर समर्थच्या जिवावर बेतला. दिवाळी सणाच्या तोंडावर शनिवारी दूपारी चारच्या सुमारास घडलेल्या दूर्घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी, समर्थ चौगुले हा सहावी मध्ये शिकत होता. वडील मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. आई पुजा कपड्याच्या दूकानात नोकरी करते. लहान भाऊ शुभम हा शाळेला असतो. दिवाळी सुट्टीमुळे शनिवारी घरी आजोबा आणि दोघे भावंडे होते. समर्थच्या घरासमोर विजेचा खांब आहे. तेथून ११ हजार व्होल्टची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यावर बाहेरुन तुटून आलेला पतंग अडकला होता. त्यावर समर्थची नजर पडताच तो पतंग खाली काढण्यासाठी धडपडू लागला. उंचावर असल्याने सहजासहजी काढता येत नव्हता. त्यामुळे समोरच्या भोरे यांच्या दूमजली घराच्या गच्चीवर तो चढला. हात पोहचत नसल्याने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना विद्युत वाहिनीला पाईचा स्पर्श होताच त्याला जोराचा धक्का बसला. पंधरा फुट उंचावरुन तो खाली कोसळून बेशुध्द पडला.गल्लीमध्ये हा प्रकार लक्षात येताच लोकांनी त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समर्थचे आई-वडील कामावर गेले होते. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांचा अक्रोश ºहदय पिळवटून टाकणारा होता. राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू