शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनी, काही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:03 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनीकाही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्ह्यातील २३४ केंद्रांवर पार पडल्या. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवीसाठी १४२ केंद्र तर आठवीसाठी ९२ केंद्रांवर परीक्षा झाली. एकूण ३६ हजार ३४२ जणांनी ही परीक्षा दिली.

शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. अनेक पालक विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी वर्षभर तयारी करून घेत असतात. हीच परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य घडवत असते. तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीच्या रूपातून आर्थिक मदत मिळत असते. त्यामुळे मिळालेल्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडत असते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रश्नपत्रिका काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून अशा अक्षम्य चुका होत असतील, तर या परीक्षा परिषदेवर विश्वास राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.

राज्यातील परीक्षा सुरळीत पार पडली, कुठेही प्रश्नपत्रिका कमी पडल्या अथवा उशिरा पोहोच झाल्या नाहीत. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांबाबत पालकांचा काही आक्षेप असला तरी परिषदेमार्फत ‘आन्सर की’ प्रसिद्ध करणार आहे. काही त्रुटी असतील त्यासंदर्भात कमिटी स्थापन केली असून, याबाबत कमिटी निर्णय घेईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.स्मिता गौंड,सहाय्यक आयुक्त, परिषद पुणे

४२४ जण गैरहजरजिल्ह्यात पाचवीसाठी २३,४५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,२१५ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. २४० परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. आठवीसाठी १३,३११ जणांनी परीक्षा अर्ज भरला होता. त्यापैकी १३,१२७ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. १८४ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली. पेपर १- सकाळी ११ ते १२.३० व पेपर २ - दुपारी १.३० ते ३ यावेळेत पार पडले. 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूरexamपरीक्षा