शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

सातारा ते कागल महामार्ग : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:44 IST

तानाजी पोवार कोल्हापूर : रोज किमान ६० ते ६५ हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या सातारा ते कागल या राष्ट्रीय  महामार्गाचे ...

ठळक मुद्देसातारा ते कागल महामार्ग : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षणसुधारित प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाकडे

तानाजी पोवारकोल्हापूर : रोज किमान ६० ते ६५ हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता नुकतीच संपल्याने सहापदरीकरण सर्वेक्षण, निविदा प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा सुधारित प्रस्ताव नुकताच राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गकडे पाठविला आहे.

सहापदरीकरण कामासाठी गेल्या दीड वर्षात तब्बल २२ वेळा निविदाचे शुद्धिकरण करून अखेर ती रद्दबातल ठरविल्याने आता नव्याने श्रीगणेशा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.सातारा ते कागल या सुमारे १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे.

डिसेंबर २०१७ ते मे २०१९ पर्यंत फक्त निविदांच्या फेºयात अडकून सहापदरीकरणाचा कागदोपत्री खेळ राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाने केल्याने वाहनधारकांतून संतापाची लाट उमटत आहे. संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा हा मुंबई ते चेन्नई सुमारे १४१९ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ आहे.

संपूर्ण महामार्गावर सातारा ते कागल वगळता इतर महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीतील सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दीड वर्षात सातारा ते कागल या सहा पदरीकरणासाठी तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक निविदा प्रक्रिया राबविली. अखेर मे २०१९ मध्ये कामाच्या खर्चाचा आकडा फुगल्याने निविदा प्रक्रियाच रद्दबातल ठरविली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम पुन्हा प्रलंबित ठेवण्याचा प्रताप केला आहे; पण आता निवडणुकीची आचारसंहितही संपली, त्यामुळे रस्ते कामासाठी नव्याने ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यामुळे सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी नव्याने सर्वेक्षण, निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचएआय) यांच्याकडे पाठविला आहे.वाद टोल आकारणी, कामाच्या दर्जाचापुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग (जुना नंबर- एन.एच.४)चे चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (एमएसआरडीसी) २००५ ला पूर्ण केले. त्यामुळे एमएसआरडीसी आणि एमएचएआय या दोघांतील करारानुसार या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व २०२२ पर्यंत टोल आकारणीची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’ची आहे. त्यानंतर संपूर्ण महामार्गाचे २०२२ पर्यंत सहापदरीकरण पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीने पाऊल उचलले.मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोरचे काम पूर्ण झाले. २०१४ मध्ये भाजप मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुणे ते सातारा हे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने (एमएचएआय) केले.

या कामाची तुलना कागल ते बंगलोर सहापदरीकरणाशी झाली. त्यामुळे पुणे ते सातारा कामाचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर आला. हा वादाचा मुद्दा ठरून काम रखडले. उर्वरित सातारा ते कागल हा रस्ता सहापदरीकरण ‘एमएचएआय’ने पूर्ण केल्यास पुढील २०२२ पर्यंत टोल कोणी आकारायचा हा मुद्दाही वादाचा ठरत आहे.पुणे ते चेन्नई (बंगलोर) रस्ता

  • २००२ : दुपदरीकरण पूर्ण
  •  २००५ : चौपदरीकरण पूर्ण
  • २०१४ : सहापदरी रस्ताकाम पूर्ण (सातारा ते कागल वगळता)
  • २०२२ पर्यंत टोलवसुलीची मुदत

 

 

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूर