शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे 

By राजाराम लोंढे | Updated: January 11, 2023 13:38 IST

कर्जमुक्ती योजनेचा लाभ विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक झाला. मात्र प्रोत्साहन अनुदानाचा तुलनेत अधिक लाभ

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या दोन यादीत सर्वाधिक २ लाख ८ हजार पात्र शेतकरी सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार असून सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सातारा अग्रभागी असला तरी लाभाच्या रकमेत कोल्हापूर जिल्हा पुढे आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. कर्जमुक्ती योजनेचा लाभ विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक झाला. मात्र प्रोत्साहन अनुदानाचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना तुलनेत अधिक लाभ होत आहे.‘प्रोत्साहन’अनुदानाच्या दोन्ही याद्यांतील लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक आहेत. तेथील २ लाख ८ हजार खातेदार पात्र ठरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ६२८ तर सांगली जिल्ह्यातील ८७ हजार ५० खातेदार पात्र ठरले आहेत. अनुदानाच्या रकमेचा विचार केला तर ‘कोल्हापूर’ जिल्हा पुढे राहणार आहे. कोल्हापूरला किमान ६९० कोटी पर्यंत येऊ शकतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळेच तालुके सिंचनाखाली असल्याने प्रत्येक तालुक्यात सरासरी ६५ टक्के उसाचे पीक घेतले जाते. परिणामी पीक कर्जाची उचल अधिक मिळत असल्याने खरीप व रब्बी हंगामासाठी तब्बल २२०० कोटी कर्ज वाटप केले जाते. त्यात नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रोत्साहन रकमेत वाढ दिसते.

पहिल्या यादीत ‘कोल्हापूर’ आघाडीवरपहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांचा समावेश होता, त्यांना ४४० कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. या तुलनेत साताऱ्यातील ८५ हजार शेतकऱ्यांना २६२ कोटी तर सांगली जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांना २०५ कोटी रुपये अनुदानाच्या रुपाने मिळाले आहे.

‘प्रोत्साहन’चे १७०० कोटी तीन जिल्ह्यांनापहिल्या यादीतील रक्कम, दुसऱ्या व आगामी तिसऱ्या यादीतील लाभार्थी व त्याची संभाव्य रक्कम पाहिली तर सुमारे १७०० कोटीचे अनुदान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रालाच अधिक लाभ का?

  • चार-पाच तालुके वगळता बहुतांशी तालुके सिंचनाखाली
  • नगदी पिकांमुळे कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण तुलनेत खूपच कमी
  • व्याज सवलतीच्या लाभासाठी वर्षाच्या आत परतफेड करण्याचा प्रयत्न
  • विकास संस्था सक्षम असल्याने पीक कर्जाचे वाटप चांगले
  • एकूण कर्ज वाटपापैकी तब्बल ९० टक्क्याहून अधिक जिल्हा बँकांकडून वाटप
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी