शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे

कोल्हापूर : समर्थ रामदास महाराजांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला सांगणे आणि त्यातून स्वराज्य स्थापना होणे ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणे आणि दिशाभूल करणे हे चुकीचे आहे, अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील प्रचारसभेत केले. शाह यांच्या या विधानाला सावंत यांनी आक्षेप घेतला.सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांचे पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी १६४२ पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. १६४२ ते १६७२ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदास महाराजांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदविलेले नाही. त्यामुळे हे चुकीचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले आहे.सावंत म्हणाले, खरेतर भाजप आणि त्यांच्या परिवारातील मंडळींनी आखलेली ही एक व्यूहरचना आहे. कारण राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होता.. तो शिवाजी को कोण पूछता.. अशी सुद्धा मुक्ताफळे उधळली होती. एवढेच नव्हे, तर गोविंदगिरी महाराजांनी ही शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केला होता.

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत : संभाजीराजेसमर्थ रामदास महत्त्वाचे आहेत. त्यांचे ते महत्त्व त्याठिकाणी. त्याला आम्ही आव्हान देत नाही. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू म्हणजे राष्ट्रमाता जिजामाताच आहेत, अशी स्पष्ट भूमिका स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास