शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे

कोल्हापूर : समर्थ रामदास महाराजांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला सांगणे आणि त्यातून स्वराज्य स्थापना होणे ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणे आणि दिशाभूल करणे हे चुकीचे आहे, अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील प्रचारसभेत केले. शाह यांच्या या विधानाला सावंत यांनी आक्षेप घेतला.सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांचे पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी १६४२ पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. १६४२ ते १६७२ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदास महाराजांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदविलेले नाही. त्यामुळे हे चुकीचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले आहे.सावंत म्हणाले, खरेतर भाजप आणि त्यांच्या परिवारातील मंडळींनी आखलेली ही एक व्यूहरचना आहे. कारण राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होता.. तो शिवाजी को कोण पूछता.. अशी सुद्धा मुक्ताफळे उधळली होती. एवढेच नव्हे, तर गोविंदगिरी महाराजांनी ही शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केला होता.

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत : संभाजीराजेसमर्थ रामदास महत्त्वाचे आहेत. त्यांचे ते महत्त्व त्याठिकाणी. त्याला आम्ही आव्हान देत नाही. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू म्हणजे राष्ट्रमाता जिजामाताच आहेत, अशी स्पष्ट भूमिका स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास