शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे

कोल्हापूर : समर्थ रामदास महाराजांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला सांगणे आणि त्यातून स्वराज्य स्थापना होणे ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणे आणि दिशाभूल करणे हे चुकीचे आहे, अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील प्रचारसभेत केले. शाह यांच्या या विधानाला सावंत यांनी आक्षेप घेतला.सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांचे पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी १६४२ पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. १६४२ ते १६७२ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदास महाराजांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदविलेले नाही. त्यामुळे हे चुकीचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले आहे.सावंत म्हणाले, खरेतर भाजप आणि त्यांच्या परिवारातील मंडळींनी आखलेली ही एक व्यूहरचना आहे. कारण राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होता.. तो शिवाजी को कोण पूछता.. अशी सुद्धा मुक्ताफळे उधळली होती. एवढेच नव्हे, तर गोविंदगिरी महाराजांनी ही शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केला होता.

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत : संभाजीराजेसमर्थ रामदास महत्त्वाचे आहेत. त्यांचे ते महत्त्व त्याठिकाणी. त्याला आम्ही आव्हान देत नाही. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू म्हणजे राष्ट्रमाता जिजामाताच आहेत, अशी स्पष्ट भूमिका स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास