शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे

कोल्हापूर : समर्थ रामदास महाराजांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला सांगणे आणि त्यातून स्वराज्य स्थापना होणे ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणे आणि दिशाभूल करणे हे चुकीचे आहे, अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील प्रचारसभेत केले. शाह यांच्या या विधानाला सावंत यांनी आक्षेप घेतला.सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांचे पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी १६४२ पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. १६४२ ते १६७२ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदास महाराजांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदविलेले नाही. त्यामुळे हे चुकीचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले आहे.सावंत म्हणाले, खरेतर भाजप आणि त्यांच्या परिवारातील मंडळींनी आखलेली ही एक व्यूहरचना आहे. कारण राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होता.. तो शिवाजी को कोण पूछता.. अशी सुद्धा मुक्ताफळे उधळली होती. एवढेच नव्हे, तर गोविंदगिरी महाराजांनी ही शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केला होता.

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत : संभाजीराजेसमर्थ रामदास महत्त्वाचे आहेत. त्यांचे ते महत्त्व त्याठिकाणी. त्याला आम्ही आव्हान देत नाही. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू म्हणजे राष्ट्रमाता जिजामाताच आहेत, अशी स्पष्ट भूमिका स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास