शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

अतिवृष्टीमुळे मुंबईहून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 3:31 PM

मुंबईसह रायगड ,ठाणे, आदी ठिकाणी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईकडून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली; तर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व कोयना एक्सप्रेस या रेल्वेगाड्या केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी रात्री देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे मुंबईहून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्दमहालक्ष्मी, कोयना एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार

कोल्हापूर : मुंबईसह रायगड ,ठाणे, आदी ठिकाणी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईकडून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली; तर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व कोयना एक्सप्रेस या रेल्वेगाड्या केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी रात्री देण्यात आली आहे.गेले दोन दिवस मुंबईसह रायगड, ठाणे ,पालघर, आदी भागांत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे लोकलसह सर्वच रेल्वेगाड्या ठप्प झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरातून सुटणारी महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस केवळ पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे; तर सकाळी सुटणारी कोयना एक्सप्रेसही पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे.

याशिवाय मुंबईहून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी एस. टी., खासगी आरामबस सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबतची माहिती छत्रपती शाहू रेल्वे टर्मिनसचे व्यवस्थापक ए. आर. फर्नांडिस यांनी दिली. 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर