शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

साहेब, काढणीचा खर्च द्या आणि टोमॅटो न्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:14 IST

उदगाव : सध्या राज्यातील शेतकºयांची अर्थिक परिस्थिती कोलमडली असून, शेतकºयांच्या तोंडचा घास भाजीपाल्याचा दर उतरल्याने काढून घेतला आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला काडीमोल भाव : पुन्हा रान तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची घाई

संतोष बामणे।उदगाव : सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती कोलमडली असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास भाजीपाल्याचा दर उतरल्याने काढून घेतला आहे. भाजीपाल्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शिरोळमधील शेतकऱ्यांना गेल्या अडीच महिन्यांपासून काडीमोल दराचे ग्रहण लागले आहे. भाजीपाला कोणी घेईना आणि कोण टोमॅटो विकत घेता का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे साहेब फक्त काढणी खर्च द्या आणि आमचा टोमॅटो न्या! अशी विनवणी शेतकरी करत आहेत.

शिरोळ तालुक्यातील उदगाव, नांदणी, दानोळी, कोथळी, उमळवाड, चिंचवाड, कवठेसार, हेरवाड, जांभळीसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते, तर गेल्या दहा वर्षांत दर्जेदार भाजीपाला पिकला नाही. पण यावर्षी विना औषधाचे पीके मोठ्या जोमात आली व उत्पादनही तीस ते चाळीस टक्के वाढले; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कर्नाटकातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे तालुक्यातील भाजीपाल्याचे दर पूर्णत: कोसळले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून कोबी व फ्लॉवर एक रुपयाला एक गड्डा, तर टोमॅटो प्रति किलो चार ते पाच रुपयांनी विक्री होत असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे भाजीपाला केलेला खर्चही न निघाल्याने शेतकºयांनी उभ्या कोबी व फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टर फिरवून सोन्यासारखी पिके खतासाठी वापरली आहेत. टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या, मेंढरे सोडून शेतकरी आर्थिक कचाट्यात आहे. शेतीला हमीभाव देणाºया सरकारने गांधारीची भूमिका घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.कृषिमंत्री कुठे आहेत?चळवळीतील कार्यकर्ते सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाजप सरकारकडून कृषिमंत्रीपद मिळाले. आमचा सदा मंत्री झाला, आता शेतकºयाला खरा न्याय मिळणार, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकºयांनी बाळगली होती. मात्र, मंत्री खोत यांनी स्वाभिमानीने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला आणि आपल्या पक्ष वाढीसाठी निवडणुकीच्या गप्पा मारणारे कृषिमंत्री सदाभाऊ खोत कुठे आहेत? अशी विचारणा शेतकºयांतून होत असून, शेतीमालाचं बोला अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.फसव्या सरकारने काय दिले!भाजीपाल्याला काडीमोल भाव असताना शेतकºयांना आमिषाचे गाजर दाखवून सत्तेवर बसलेल्या सरकारने शेतकºयांना भीक मागण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे शेतीच्या हमीभावासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यामुळे मी संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव व स्वामिनाथन आयोग लागू केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जीव हळहळतोय : जिवापाड भाजीपाला जतन करून दराअभावी फुकट टोमॅटो देण्याची वेळ आली आहे, तर बाजारपेठेत प्रति किलो टोमॅटो तीन ते चार रुपये दराने कोणी विकत घेतले तर खपतात. गेल्या पंधरा दिवसांपासून माल विक्री होत नसल्याने उभ्या पिकात मेंढरे सोडताना जीव हळहळतोय, असे उमळवाडचे शेतकरी सुभाष मगदूम यांनी सांगितले.सध्या भाजीपाला पिकास हवामान चांगले असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढली आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भाजीपाल्याला दर मिळत नाही. शासनाने भाजीपाला पिकासाठी स्थिर दर आकारला पाहिजे. शेतकºयांबरोबर ग्राहकालाही त्याचा फायदा होईल. भाजीपाल्याच्या जादा उत्पादनामुळे दर गडगडला असून, व्यापारी व दलाल यांचाच फायदा होत आहे.- इमाम जमादार, शेतकरी हेरवाड

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर