शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, काढणीचा खर्च द्या आणि टोमॅटो न्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:14 IST

उदगाव : सध्या राज्यातील शेतकºयांची अर्थिक परिस्थिती कोलमडली असून, शेतकºयांच्या तोंडचा घास भाजीपाल्याचा दर उतरल्याने काढून घेतला आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला काडीमोल भाव : पुन्हा रान तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची घाई

संतोष बामणे।उदगाव : सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती कोलमडली असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास भाजीपाल्याचा दर उतरल्याने काढून घेतला आहे. भाजीपाल्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शिरोळमधील शेतकऱ्यांना गेल्या अडीच महिन्यांपासून काडीमोल दराचे ग्रहण लागले आहे. भाजीपाला कोणी घेईना आणि कोण टोमॅटो विकत घेता का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे साहेब फक्त काढणी खर्च द्या आणि आमचा टोमॅटो न्या! अशी विनवणी शेतकरी करत आहेत.

शिरोळ तालुक्यातील उदगाव, नांदणी, दानोळी, कोथळी, उमळवाड, चिंचवाड, कवठेसार, हेरवाड, जांभळीसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते, तर गेल्या दहा वर्षांत दर्जेदार भाजीपाला पिकला नाही. पण यावर्षी विना औषधाचे पीके मोठ्या जोमात आली व उत्पादनही तीस ते चाळीस टक्के वाढले; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कर्नाटकातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे तालुक्यातील भाजीपाल्याचे दर पूर्णत: कोसळले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून कोबी व फ्लॉवर एक रुपयाला एक गड्डा, तर टोमॅटो प्रति किलो चार ते पाच रुपयांनी विक्री होत असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे भाजीपाला केलेला खर्चही न निघाल्याने शेतकºयांनी उभ्या कोबी व फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टर फिरवून सोन्यासारखी पिके खतासाठी वापरली आहेत. टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या, मेंढरे सोडून शेतकरी आर्थिक कचाट्यात आहे. शेतीला हमीभाव देणाºया सरकारने गांधारीची भूमिका घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.कृषिमंत्री कुठे आहेत?चळवळीतील कार्यकर्ते सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाजप सरकारकडून कृषिमंत्रीपद मिळाले. आमचा सदा मंत्री झाला, आता शेतकºयाला खरा न्याय मिळणार, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकºयांनी बाळगली होती. मात्र, मंत्री खोत यांनी स्वाभिमानीने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला आणि आपल्या पक्ष वाढीसाठी निवडणुकीच्या गप्पा मारणारे कृषिमंत्री सदाभाऊ खोत कुठे आहेत? अशी विचारणा शेतकºयांतून होत असून, शेतीमालाचं बोला अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.फसव्या सरकारने काय दिले!भाजीपाल्याला काडीमोल भाव असताना शेतकºयांना आमिषाचे गाजर दाखवून सत्तेवर बसलेल्या सरकारने शेतकºयांना भीक मागण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे शेतीच्या हमीभावासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यामुळे मी संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव व स्वामिनाथन आयोग लागू केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जीव हळहळतोय : जिवापाड भाजीपाला जतन करून दराअभावी फुकट टोमॅटो देण्याची वेळ आली आहे, तर बाजारपेठेत प्रति किलो टोमॅटो तीन ते चार रुपये दराने कोणी विकत घेतले तर खपतात. गेल्या पंधरा दिवसांपासून माल विक्री होत नसल्याने उभ्या पिकात मेंढरे सोडताना जीव हळहळतोय, असे उमळवाडचे शेतकरी सुभाष मगदूम यांनी सांगितले.सध्या भाजीपाला पिकास हवामान चांगले असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढली आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भाजीपाल्याला दर मिळत नाही. शासनाने भाजीपाला पिकासाठी स्थिर दर आकारला पाहिजे. शेतकºयांबरोबर ग्राहकालाही त्याचा फायदा होईल. भाजीपाल्याच्या जादा उत्पादनामुळे दर गडगडला असून, व्यापारी व दलाल यांचाच फायदा होत आहे.- इमाम जमादार, शेतकरी हेरवाड

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर