शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:33 IST

वडिलांच्या स्मरणार्थ पाच गुंठे क्षेत्र एकटी संस्थेला दान

कोल्हापूर : भारतरत्न रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी समाजासाठी काय-काय केले, हे वाचून त्यांच्याही मनात आपणही काही समाजाचे ऋण फेडावे, अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी निर्णय घेतला. वडणगे-निगवे (ता. करवीर) रस्त्यावरील सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा ५ गुंठे भूखंड एकटी संस्थेला दान केला. त्या जागेवर असलेल्या खोल्यांचा किल्ल्याच त्यांनी सोमवारी अवनी संस्थेकडे सुपूर्द केल्या. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे सागर रंगराव पाटील. नववर्षात आपण हे करू, ते करू असा अनेकजण पण करतात, परंतु त्यांनी जे मनात आले ते करून कोल्हापूरच्या मातीची दातृत्वाची भावना जोपासली.सागर पाटील हे शाहुपुरीत राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. हा भूखंडही त्यांच्या वडिलांनीच घेतला होता. आपण शहरात राहतो. या भूखंडाचा आता तसा आपल्याला फारसा काही उपयोग नाही, तो चांगल्या कामासाठी द्यावा, असा विचार त्यांनी केला. सख्ख्या भावासाठीही गुंठाभर जमीन सोडताना वाद घालणारा समाज सगळीकडे असताना, त्यांनी मात्र क्षणाचाही विलंब न लावता भूखंड देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी स्वत:हून अवनी संस्थेशी जेव्हा संपर्क साधला, तेव्हा संस्थेलाही क्षणभर त्यावर विश्वासच बसला नाही. आम्हाला आई-वडिलांनी सगळे भरभरून दिले, म्हणून त्यातीलच मूठभर आम्ही समाजासाठी देत असल्याची त्यांची भावना आहे. समाजात अशी माणसे आहेत, म्हणूनच हा गाडा पुढे चालतो आहे. ते म्हणतात, पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षाही आयुष्यात गोरगरिबांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. मृत्यूनंतरही तुमचे कार्य चिरस्मरण राहण्यासाठी गोरगरीब, निराधार लोकांसाठी मदत केली पाहिजे.एकटी संस्थेचे सामाजिक कार्य पाहून सागर पाटील यांनी हा भूखंड दिला. वडील रंगराव यांना ते अण्णा म्हणत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे दान केले. एकटी संस्था तिथे ‘अण्णामाई सेवासदन’ सुरू करणार आहे. जागेच्या उद्घाटन सोहळ्यास गीतादेवी रंगराव पाटील प्रमुख उपस्थित होत्या. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.सरपंच पाटील म्हणाल्या, समाजातील माणुसकी हरवत चालली असता, सागर पाटील यांनी केलेले काम आदर्शवत आहे. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, या जागेत आम्ही बेघर वृद्धांसाठी मोफत निवारा करत आहोत. डॉ. अजित देवणे यांनी ‘अण्णामाई सेवासदन’मधील लोकांच्या औषध उपचाराचा खर्च मोफत करणार असल्याचे सांगितले.या वेळी डॉ. अमरसिंह रजपूत, एकटी संस्थेचे सल्लागार जैनुद्दीन पन्हाळकर, तलाठी प्रकाश महाडेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. इकबाल रेठरेकर, अक्षय पाटील, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, जगदीश कांबळे, सविता कांबळे, अभिजीत कांबळे, पवन कदम, शुभम कामत, अर्चना गाडी, कार्तिकी निगवेकर, निकीता राजपूत आदींनी संयोजन केले. सुरेखा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर