शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:33 IST

वडिलांच्या स्मरणार्थ पाच गुंठे क्षेत्र एकटी संस्थेला दान

कोल्हापूर : भारतरत्न रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी समाजासाठी काय-काय केले, हे वाचून त्यांच्याही मनात आपणही काही समाजाचे ऋण फेडावे, अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी निर्णय घेतला. वडणगे-निगवे (ता. करवीर) रस्त्यावरील सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा ५ गुंठे भूखंड एकटी संस्थेला दान केला. त्या जागेवर असलेल्या खोल्यांचा किल्ल्याच त्यांनी सोमवारी अवनी संस्थेकडे सुपूर्द केल्या. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे सागर रंगराव पाटील. नववर्षात आपण हे करू, ते करू असा अनेकजण पण करतात, परंतु त्यांनी जे मनात आले ते करून कोल्हापूरच्या मातीची दातृत्वाची भावना जोपासली.सागर पाटील हे शाहुपुरीत राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. हा भूखंडही त्यांच्या वडिलांनीच घेतला होता. आपण शहरात राहतो. या भूखंडाचा आता तसा आपल्याला फारसा काही उपयोग नाही, तो चांगल्या कामासाठी द्यावा, असा विचार त्यांनी केला. सख्ख्या भावासाठीही गुंठाभर जमीन सोडताना वाद घालणारा समाज सगळीकडे असताना, त्यांनी मात्र क्षणाचाही विलंब न लावता भूखंड देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी स्वत:हून अवनी संस्थेशी जेव्हा संपर्क साधला, तेव्हा संस्थेलाही क्षणभर त्यावर विश्वासच बसला नाही. आम्हाला आई-वडिलांनी सगळे भरभरून दिले, म्हणून त्यातीलच मूठभर आम्ही समाजासाठी देत असल्याची त्यांची भावना आहे. समाजात अशी माणसे आहेत, म्हणूनच हा गाडा पुढे चालतो आहे. ते म्हणतात, पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षाही आयुष्यात गोरगरिबांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. मृत्यूनंतरही तुमचे कार्य चिरस्मरण राहण्यासाठी गोरगरीब, निराधार लोकांसाठी मदत केली पाहिजे.एकटी संस्थेचे सामाजिक कार्य पाहून सागर पाटील यांनी हा भूखंड दिला. वडील रंगराव यांना ते अण्णा म्हणत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे दान केले. एकटी संस्था तिथे ‘अण्णामाई सेवासदन’ सुरू करणार आहे. जागेच्या उद्घाटन सोहळ्यास गीतादेवी रंगराव पाटील प्रमुख उपस्थित होत्या. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.सरपंच पाटील म्हणाल्या, समाजातील माणुसकी हरवत चालली असता, सागर पाटील यांनी केलेले काम आदर्शवत आहे. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, या जागेत आम्ही बेघर वृद्धांसाठी मोफत निवारा करत आहोत. डॉ. अजित देवणे यांनी ‘अण्णामाई सेवासदन’मधील लोकांच्या औषध उपचाराचा खर्च मोफत करणार असल्याचे सांगितले.या वेळी डॉ. अमरसिंह रजपूत, एकटी संस्थेचे सल्लागार जैनुद्दीन पन्हाळकर, तलाठी प्रकाश महाडेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. इकबाल रेठरेकर, अक्षय पाटील, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, जगदीश कांबळे, सविता कांबळे, अभिजीत कांबळे, पवन कदम, शुभम कामत, अर्चना गाडी, कार्तिकी निगवेकर, निकीता राजपूत आदींनी संयोजन केले. सुरेखा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर