शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

एस. टी. च्या रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटींचा तोटा-- - उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:15 IST

रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो.

ठळक मुद्देरत्नागिरीत डिझेल खरेदीलाही निधी नसल्याने प्रवाशांचे हाल

रत्नागिरी : रत्नागिरी एस. टी. विभागाच्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. गणेशोत्सव आणि मे महिन्यात जादा उत्पन्न मिळत असले अन्य दहा महिने खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड बनले आहे. रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटी ५ लाखाचा तोटा सोसावा लागत आहे.रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो. परंतु ६ कोटी २५ लाख ५८ हजार इतका खर्च असल्यामुळे दरमहा १ ते दीड कोटीचा तोटा सोसावा लागत आहे. रत्नागिरी आगाराप्रमाणेच अन्य आठ आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.रत्नागिरी विभागाचे दरमहा २२ कोटी ७४ लाख ५७ हजार इतके उत्पन्न आहे. ६१ लाख ४६ हजार किलोमीटर प्रवास होत असल्याने २९ कोटी ७९ लाख ६२ हजार इतका खर्च होत आहे. त्यामुळे दरमहा ७ कोटी ५ लाखांचा तोटा सोसावा लागत आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात सोडल्या जाणाऱ्या जादा गाड्यांमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दोन महिन्यात काहीशी तूट भरुन निघण्यास मदत होत असली तरी उर्वरित दहा महिने विभागाला आर्थिक तोटाच सोसावा लागत आहे. वर्षभराचा तोटा ७० कोटींमध्ये जात असल्याने विभागाला महामंडळाकडून आर्थिक सहकार्य केले जात आहे.रत्नागिरी विभागाला डिझेलसाठी दररोज ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. डिझेलचे पैसे एक दिवस आधी ऑनलाईनने भरले तरच दुसऱ्या दिवशी डिझेल पुरवठा उपलब्ध होतो. परंतु उत्पन्नच घटल्यामुळे प्रशासनाला खर्च भागवणे अवघड बनले आहे. डिझेलप्रमाणे स्पेअर पार्टस्चाही तुटवडा भासत आहे. स्पेअर पार्टस् उपलब्ध नसल्यामुळे नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. स्पेअर पार्टस्साठीच्या आधी करण्यात आलेल्या खरेदीचे तब्बल ४ कोटी रुपये देणे शिल्लक असल्यामुळे नव्याने स्पेअर पार्टस् उपलब्ध होणे अवघड बनले आहे.खासगी वाहतुकीमध्ये झालेली वाढ, कर्मचाऱ्यांची कमतरता, स्पेअर पार्टअभावी बंद पडणाऱ्या बसेस, महामंडळाची धोरणे, राजकीय अनास्था इत्यादीमुळे एसटीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शालेय विद्यार्थी तसेच इतरांना सवलतीच्या दरात एसटी सुविधा उपलब्ध केली जाते. परंतु शासनाकडून त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम एस. टी.च्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

 

भारमान कमीडिझेलचे पैसे उपलब्ध करणे अवघड झाल्याने डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अखेर रत्नागिरी विभागाने डिझेल पुरवठ्यासाठी पैसे जमा केले. त्यामुळे टँकरची उपलब्धता झाली. परंतु भारमान कमी होत असल्याने हे संकट वारंवार उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

रत्नागिरी एस. टी. विभागाच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा मोठा आहे. दरमहा ७ कोटीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात आर्थिक उत्पन्नाचा हातभार लागता असला तरी अन्य दहा महिने मात्र हा तोटा कमी जास्त प्रमाणात सोसावाच लागत आहे.- सुनील भोकरे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटीMONEYपैसा