शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एस. टी. च्या रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटींचा तोटा-- - उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:15 IST

रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो.

ठळक मुद्देरत्नागिरीत डिझेल खरेदीलाही निधी नसल्याने प्रवाशांचे हाल

रत्नागिरी : रत्नागिरी एस. टी. विभागाच्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. गणेशोत्सव आणि मे महिन्यात जादा उत्पन्न मिळत असले अन्य दहा महिने खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड बनले आहे. रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटी ५ लाखाचा तोटा सोसावा लागत आहे.रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो. परंतु ६ कोटी २५ लाख ५८ हजार इतका खर्च असल्यामुळे दरमहा १ ते दीड कोटीचा तोटा सोसावा लागत आहे. रत्नागिरी आगाराप्रमाणेच अन्य आठ आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.रत्नागिरी विभागाचे दरमहा २२ कोटी ७४ लाख ५७ हजार इतके उत्पन्न आहे. ६१ लाख ४६ हजार किलोमीटर प्रवास होत असल्याने २९ कोटी ७९ लाख ६२ हजार इतका खर्च होत आहे. त्यामुळे दरमहा ७ कोटी ५ लाखांचा तोटा सोसावा लागत आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात सोडल्या जाणाऱ्या जादा गाड्यांमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दोन महिन्यात काहीशी तूट भरुन निघण्यास मदत होत असली तरी उर्वरित दहा महिने विभागाला आर्थिक तोटाच सोसावा लागत आहे. वर्षभराचा तोटा ७० कोटींमध्ये जात असल्याने विभागाला महामंडळाकडून आर्थिक सहकार्य केले जात आहे.रत्नागिरी विभागाला डिझेलसाठी दररोज ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. डिझेलचे पैसे एक दिवस आधी ऑनलाईनने भरले तरच दुसऱ्या दिवशी डिझेल पुरवठा उपलब्ध होतो. परंतु उत्पन्नच घटल्यामुळे प्रशासनाला खर्च भागवणे अवघड बनले आहे. डिझेलप्रमाणे स्पेअर पार्टस्चाही तुटवडा भासत आहे. स्पेअर पार्टस् उपलब्ध नसल्यामुळे नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. स्पेअर पार्टस्साठीच्या आधी करण्यात आलेल्या खरेदीचे तब्बल ४ कोटी रुपये देणे शिल्लक असल्यामुळे नव्याने स्पेअर पार्टस् उपलब्ध होणे अवघड बनले आहे.खासगी वाहतुकीमध्ये झालेली वाढ, कर्मचाऱ्यांची कमतरता, स्पेअर पार्टअभावी बंद पडणाऱ्या बसेस, महामंडळाची धोरणे, राजकीय अनास्था इत्यादीमुळे एसटीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शालेय विद्यार्थी तसेच इतरांना सवलतीच्या दरात एसटी सुविधा उपलब्ध केली जाते. परंतु शासनाकडून त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम एस. टी.च्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

 

भारमान कमीडिझेलचे पैसे उपलब्ध करणे अवघड झाल्याने डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अखेर रत्नागिरी विभागाने डिझेल पुरवठ्यासाठी पैसे जमा केले. त्यामुळे टँकरची उपलब्धता झाली. परंतु भारमान कमी होत असल्याने हे संकट वारंवार उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

रत्नागिरी एस. टी. विभागाच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा मोठा आहे. दरमहा ७ कोटीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात आर्थिक उत्पन्नाचा हातभार लागता असला तरी अन्य दहा महिने मात्र हा तोटा कमी जास्त प्रमाणात सोसावाच लागत आहे.- सुनील भोकरे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटीMONEYपैसा