शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Kolhapur: एमडींना मारहाण होताच ऊस तोडून नेण्याची घाई; राजाराम कारखान्याची तत्परता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:35 IST

मग इतके दिवस तोड का दिली नाही ?

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याकडून सभासद शेतकऱ्याला कोणतीही कल्पना न देता शिवारातील ऊस रात्री तोडून तो पहाटे कारखान्याकडे घेऊन जाण्याचा प्रकार घडला. यावर कसबा बावडा येथील शेतकरी पंडित नेजदार यांनी आक्षेप घेतला असून याचा निषेध त्यांनी केला. याशिवाय याचा जाब देखील त्यांनी संबंधितांना विचारला. विरोधी शेतकऱ्यांच्या उसाला तोड द्यायची होती तर इतके दिवस गप्प का होता. रात्री अचानक तोड देऊन पहाटे कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यामागे कारखान्याचा कोणता हेतू आहे, असा सवालही आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.राजाराम कारखान्याकडून, ऊस वेळेत नेला जात नसल्याने मंगळवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. याशिवाय संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण केल्याची घटना त्याच दिवशी घडली. या प्रकारानंतर कारखाना प्रशासनाने आपण विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस देखील नेला आहे. हे दाखवण्यासाठी मंगळवारी रात्री पंडित नेजदार यांच्या उसाला तोड देत बुधवारी पहाटे हा ऊस ट्रॅक्टरद्वारे राजाराम कारखान्याला नेला.हा प्रकार समजल्यानंतर पंडित नेजदार यांनी यावर आक्षेप घेतला. विरोधी शेतकऱ्यांच्या उसाला तोड द्यायची होती तर इतके दिवस गप्प का होता. रात्री अचानक तोड देऊन पहाटे कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यामागे कारखान्याचा कोणता हेतू आहे, असा सवालही पंडित नेजदार यांनी उपस्थित केला.मारहाण रागातूनच..राजाराम कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांच्या उसाला वेळेत तोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उभा ऊस शिवारातच वाळू लागला होता. कारखाना निवडणुकीच्या काळात ज्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली अशा विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस कारखान्याकडून जाणीवपूर्वक नेला जात नाही. मात्र, याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मंगळवारी कारखान्याचे कार्यकारी संचालक चिटणीस यांना मारहाणीची घटना घडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस