शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मंदिर जतन संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटी मंजूर, काम पूर्ण करण्याची मुदत किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:35 IST

पहिल्या टप्प्याला नियोजनची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या आराखड्याला गुरुवारी नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. या अंतर्गत पुरातत्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम, गळती, शिल्पांचे जतन संवर्धनाची कामे करून मूळ ढाच्याचे सक्षमीकरण केले जाणार आहे. यातील प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन विभागाने ३१ मार्च २०२८ पर्यंतची मुदत दिली असून संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५ काेटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे २०२५ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आराखड्याच्या कार्यवाहीचे टप्पे व कामांचा प्राधान्यक्रम याबाबत उच्चाधिकार समितीने छाननी करून १६ जुलै २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना मान्यता दिली. तसेच भूसंपादनाचे धोरण व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या भूसंपादन समितीचा अहवाल मिळाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल. अंबाबाई आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता अजून मिळाली नव्हती. प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय पुढे निधीची तरतूद व विकासकामांना सुरुवात होत नाही. अखेर गुरुवारी नियोजन विभागाने पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली.

अध्यादेशातील तरतूदी..

  • आराखड्यातील कामांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी हे संनियंत्रण अधिकारी असतील.
  • प्रस्तावित कामे ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करावीत
  • पहिला टप्पा वगळता अन्य कामांचा समावेश यात असू नये
  • कामांची द्विरूक्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वास्तू जतन संवर्धनाची कामे पुरातत्व तसेच राज्य पुरातत्व विभागाकडून करून घ्यावी.

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीआराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली एक जिल्हास्तरीय तांत्रिक समिती गठित करण्यात येणार आहे. यात जिल्हा नियाेजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

पहिल्या टप्प्यातील कामे-श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा साडेचारशे कोटींचा असला तरी सध्या त्यातील मंदिर व परिसर जतन संवर्धनाच्या १४३ कोटींच्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. यात मंदिराच्या दगडी बांधकामाचे सक्षमीकरण, जतन संवर्धन, सुटलेले दगड जोडणे, छताची गळती काढणे, शिल्पांचे मूळ स्वरूप खुलवणे व डागडूजी, मंदिर परिसरातील खासगी मंदिरांचेही जतन संवर्धन, दगडांवरील रंग काढून मूळ स्वरुपात आणणे ही कामे केली जातील.