शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

सरकारविरोधात रस्त्यावर या; मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:01 AM

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ

ठळक मुद्देव्यापारी, उद्योजकांशी संवाद; जानेवारीत व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठक घेणारटेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रम कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तुमची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.

टेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या ‘जीएसटी’सह विविध अडचणी व प्रश्नांंबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. यानंतर उद्योजक, व्यापाºयांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, व्यापारी व उद्योजकांनी आपल्याकडे मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू; परंतु ‘जीएसटी’सह विविध प्रश्नांवर महाराष्टÑातील व्यापारी, उद्योजक गप्प का आहेत, असा प्रश्न पडतो. ते दबलेले असून आपल्या न्यायासाठी त्यांचे त्यांनाच उभे राहावे लागेल. त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यास मीही त्यांच्यासोबत राहीन. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जानेवारी महिन्यात मुंबईत व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांवर बैठक घेतली जाईल.चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून व्यापारी व उद्योजकांसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जावेत.

उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, उद्योगासाठी विजेचे दर कमी करण्यासाठी सरकारकडे भूमिका मांडली जावी. कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, शहरात दिल्लीसारखे ट्रॅफिक झाले असून यासाठी उड्डाणपूल होण्याची गरज आहे. तसेच वॉल मार्क कंपनीला शिवसेनेने बाजारात पाय ठेवू देऊ नये.

‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर-बंगलोर कॉरिडॉरला चालना मिळावी.गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार म्हणाले, उद्योगवाढीसाठी जागा उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी. इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, शेतीउपयोगी इलेक्ट्रिक साहित्यावरील ‘जीएसटी’चे दर कमी व्हावेत.

‘क्रीडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘जीएसटी’मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून औषधांचे दर वाढले आहेत.यावेळी संजय शेटे, गोरख माळी, जयेश ओसवाल, संदीप नष्टे, आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडेकेंद्र व राज्य सरकार नोटाबंदीसारखे मनमानी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशांसाठी रांगेत उभे करीत असेल, तसेच स्वत:च्या पैशासाठी बोटाला शाई लावून घ्यावी लागत असेल, तर ही वाटचाल हुकूमशाहीआणि कम्युनिझमकडेच सुरू असल्याचे म्हणावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.सरकार म्हणजे ‘नवसाचे पोर’सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण