शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

कुरुंदवाडवासीयांची दु:ख सावरत उभारी -: महापुराच्या फटक्याने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:06 AM

कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना सधन बनवणारी कृष्णा-पंचगंगा बनली महापुराच्या रूपाने काळ

गणपती कोळी -- आॅन दी स्पॉट  कुरुंदवाड

कुरुंदवाड : कृष्णा-पंचगंगेच्या काठावर वसलेले कुरुंदवाड हे शहर मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि कष्टाळू शेतकरी यामुळे सधन बनले आहे. मात्र, नैसर्गिक वरदान लाभलेल्या या नद्यांनी महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. शहराला कृष्णा व पंचगंगा नदीने वळसा घातल्याने पाण्याची कमतरता कधीच भासली नाही. इतकेच नव्हे, तर शहराला पाणी कधीच कमी पडू नये यासाठी संस्थानिकांनी पंचगंगेपासून भैरववाडी-कुरुंदवाड दरम्यान कृत्रिम नदी नेली आहे. त्यामुळे बारमाही पाण्याचा वापर शेतीसाठी, शहरासाठी करून शेतीतून सोने पिकवित आहे.

या कष्टाला महापुराने दृष्ट लावली. गावचावडीसमोरील व माळभागावरील काही भाग वगळता शहर पूर्णपणे पाण्याखाली होते. चोहोबाजूंनी पाणी आल्याने महापुरात शहर दहा दिवस बेट झाले होते. शहरात पाणी वाढत गेल्याने नागरिकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आहे त्या कपड्यावर शहर सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. मात्र, कृष्णा व पंचगंगेने रौद्ररूप धारण केल्याने काडी-काडी जमवून संसार उभे केलेल्या शेकडो कुटुंबांचे संसार पाण्याचा लाटेत वाहून गेले आहेत. लष्कर, एनडीआरएफच्या पथकांनी नागरिकांचे जीव वाचविले असले तरी कुटुंबाचा आधार असलेली दुभती जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करावयाचे की, मोडलेला संसार उभा करावयाचा? हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे.

मात्र, येणाºया संकटाला धैर्याने तोंड देणाºया शहरवासीय पूर ओसरताच दु:ख विसरून नव्या जोमाने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन, सामाजिक संस्था, पालिका प्रशासनाच्या साथीने नागरिक पुरामुळे घाण झालेले शहर स्वच्छ करीत आहेत. स्थलांतरित कुटुंबप्रमुख कुटुंबाला न आणता घर, परिसर स्वच्छ करून मगच कुटुंबाला घरी आणत आहेत. शहर शंभर टक्के पूरग्रस्त असल्याने गावचावडीमध्ये प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून पाच हजारांची अनुदानाची रक्कम दिली जात आहे. पालिका प्रशासन प्रथम शहर स्वच्छतेला महत्त्व देत असून, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत.शेतक-यांना भरीव मदत द्यावीकुरुंदवाड शहर हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, महापुराने शेतीची धूळधाण केली असून, शेतकºयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान दिले असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना व त्यावर अवलंबून असणाºया शेतमजुरांना भरीव मदत देण्याची मागणी होत आहे.साथी रोखण्यासाठी आरोग्य तपासणीपूर ओसरल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्यानेडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अजय हेल्थ केअर (पुणे) यांचे पथक शहरात आरोग्य तपासणी मोहीम राबवित आहेत. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने आठ ठिकाणी, तर अजय हेल्थ केअरने पाच ठिकाणी तपासणी व उपचार शिबिर राबविले आहे.शैक्षणिक कागदपत्रांचे नुकसानशहर व परिसरातील २७ गावांमधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण देणाºया येथील सहकार भूषणएस. के. पाटील महाविद्यालयही या महापुरातून सुटले नाही. माळभागावर असलेल्या या महाविद्यालयातील तळमजला पाण्याखाली होता. त्यामुळे शैक्षणिक साहित्याबरोबरच महत्त्वाची कागदपत्रे भिजून नष्ट झाली आहेत.स्वच्छतेवर भरपुरामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर विविध सामाजिक संघटना, शहरातील मंडळे स्वच्छता मोहीम राबवित आहेत. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर