शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

कुरुंदवाडवासीयांची दु:ख सावरत उभारी -: महापुराच्या फटक्याने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:07 IST

कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना सधन बनवणारी कृष्णा-पंचगंगा बनली महापुराच्या रूपाने काळ

गणपती कोळी -- आॅन दी स्पॉट  कुरुंदवाड

कुरुंदवाड : कृष्णा-पंचगंगेच्या काठावर वसलेले कुरुंदवाड हे शहर मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि कष्टाळू शेतकरी यामुळे सधन बनले आहे. मात्र, नैसर्गिक वरदान लाभलेल्या या नद्यांनी महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. शहराला कृष्णा व पंचगंगा नदीने वळसा घातल्याने पाण्याची कमतरता कधीच भासली नाही. इतकेच नव्हे, तर शहराला पाणी कधीच कमी पडू नये यासाठी संस्थानिकांनी पंचगंगेपासून भैरववाडी-कुरुंदवाड दरम्यान कृत्रिम नदी नेली आहे. त्यामुळे बारमाही पाण्याचा वापर शेतीसाठी, शहरासाठी करून शेतीतून सोने पिकवित आहे.

या कष्टाला महापुराने दृष्ट लावली. गावचावडीसमोरील व माळभागावरील काही भाग वगळता शहर पूर्णपणे पाण्याखाली होते. चोहोबाजूंनी पाणी आल्याने महापुरात शहर दहा दिवस बेट झाले होते. शहरात पाणी वाढत गेल्याने नागरिकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आहे त्या कपड्यावर शहर सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. मात्र, कृष्णा व पंचगंगेने रौद्ररूप धारण केल्याने काडी-काडी जमवून संसार उभे केलेल्या शेकडो कुटुंबांचे संसार पाण्याचा लाटेत वाहून गेले आहेत. लष्कर, एनडीआरएफच्या पथकांनी नागरिकांचे जीव वाचविले असले तरी कुटुंबाचा आधार असलेली दुभती जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करावयाचे की, मोडलेला संसार उभा करावयाचा? हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे.

मात्र, येणाºया संकटाला धैर्याने तोंड देणाºया शहरवासीय पूर ओसरताच दु:ख विसरून नव्या जोमाने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन, सामाजिक संस्था, पालिका प्रशासनाच्या साथीने नागरिक पुरामुळे घाण झालेले शहर स्वच्छ करीत आहेत. स्थलांतरित कुटुंबप्रमुख कुटुंबाला न आणता घर, परिसर स्वच्छ करून मगच कुटुंबाला घरी आणत आहेत. शहर शंभर टक्के पूरग्रस्त असल्याने गावचावडीमध्ये प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून पाच हजारांची अनुदानाची रक्कम दिली जात आहे. पालिका प्रशासन प्रथम शहर स्वच्छतेला महत्त्व देत असून, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत.शेतक-यांना भरीव मदत द्यावीकुरुंदवाड शहर हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, महापुराने शेतीची धूळधाण केली असून, शेतकºयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान दिले असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना व त्यावर अवलंबून असणाºया शेतमजुरांना भरीव मदत देण्याची मागणी होत आहे.साथी रोखण्यासाठी आरोग्य तपासणीपूर ओसरल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्यानेडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अजय हेल्थ केअर (पुणे) यांचे पथक शहरात आरोग्य तपासणी मोहीम राबवित आहेत. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने आठ ठिकाणी, तर अजय हेल्थ केअरने पाच ठिकाणी तपासणी व उपचार शिबिर राबविले आहे.शैक्षणिक कागदपत्रांचे नुकसानशहर व परिसरातील २७ गावांमधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण देणाºया येथील सहकार भूषणएस. के. पाटील महाविद्यालयही या महापुरातून सुटले नाही. माळभागावर असलेल्या या महाविद्यालयातील तळमजला पाण्याखाली होता. त्यामुळे शैक्षणिक साहित्याबरोबरच महत्त्वाची कागदपत्रे भिजून नष्ट झाली आहेत.स्वच्छतेवर भरपुरामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर विविध सामाजिक संघटना, शहरातील मंडळे स्वच्छता मोहीम राबवित आहेत. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर