शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांविरुद्धची नाराजी, जातीय समीकरणेच ठरविणार निकाल कागवाड मतदारसंघ : राजू कागे यांचा ‘पंचकार’ की, श्रीमंत पाटील यांचा विधानसभा प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:47 IST

अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे.

चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार राजू कागे आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कागे विजयी झाल्यास तो त्यांच्या विजयाचा ‘पंचकार’ ठरणार आहे. तर तीनवेळच्या पराभवाची मालिका खंडित करून श्रीमंत पाटील विजयी झाल्यास ते प्रथमच विधानसभेत प्रवेश करतील.

कागवाड मतदारसंघात कागे, श्रीमंत पाटील, जनता दलाचे कल्लाप्पाण्णा मग्याण्णावर यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात जोर मात्र काँग्रेस, भाजप आणि जनता दल यांचाच दिसत आहे. येथून राजू कागे १९९९ पासून म्हणजेच गेली १९ वर्षे आमदार आहेत. १९९९ साली काँग्रेसच्या पोपट पाटील यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राजू कागे यांनी संयुक्त जनता दलाच्या उमेदवारीवर विजय मिळविला होता. २००४ निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे किरणकुमार पाटील यांना पराभूत करून ते पुन्हा आमदार झाले. २००८ मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्विजय पवार-देसाई यांचा पराभव केला. तर गेल्या म्हणजेच २०१३ च्या निवडणुकीत श्रीमंत पाटील (निधर्मी जनता दल) यांचा पराभव करून कागे यांनी विजयाचा ‘चौकार’ मारला. यंदा ‘पंचकार’ मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसचे श्रीमंत पाटील यांनीही २००८ आणि २०१३ मध्ये निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविली आहे. या दोन्ही वेळेला अनुक्रमे त्यांनी १४.७५ आणि ३०.१८ टक्के मते मिळवून ते तिसऱ्या आणि दुसºया क्रमांकावर आले होते. त्याशिवाय २०१४ ची लोकसभा निवडणूकही त्यांनी निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर लढविली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यावेळी विजयी झाल्यास पराभवाची ही मालिका खंडित करून ते विधानसभेत प्रवेश करतील.

कागे हे गेल्या १९ वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांना सामोरे जात आहेत. तर श्रीमंत पाटील यांनी कोणतीही सत्ता नसताना ‘अथणी शुगर फार्मर्स’ या साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. त्यांनी केंपवाड परिसरात ३४ पाणी योजना राबवून सुमारे १० हजार एकर शेती सिंचनाखाली आणली आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकºयांच्या विकासात योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून केंपवाड परिसरातील कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात.

कागे यांना गेल्या तीन निवडणुकीत ४४ हजार ५२९ ते ४१ हजार ७८४ या दरम्यान मते मिळाली आहेत. याचाच अर्थ त्यांची व्होट बँक स्थिर असल्याचे दिसते. यावेळीही याच व्होट बँकेच्या जोरावर ते विजयाचा विश्वास व्यक्त करतात.श्रीमंत पाटील हे मराठा समाजाचे आहेत. प्रस्थापित आमदारांबाबतची नाराजी आणि आपले काम यामुळे आपणच विजयी होणार असल्याचा दावा ते करीत आहेत. यात नेमके कोण बाजी मारणार हे १५ मे रोजीसमजेल.लिंगायत समाजाचे मतदार सर्वाधिकया मतदारसंघात जातीय समीकरणही महत्त्वाचे ठरते. राजू कागे हे लिंगायत समाजाचे आहेत. तर श्रीमंत पाटील हे मराठा आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. त्या खालोखाल मराठा, जैन आणि इतर समाजाची मते आहेत.

शेवटचे दोन दिवस महत्त्वाचेप्रचार शिगेला पोहोचला असताना हवा काँग्रेसची दिसत असली तरी शेवटच्या दोन-तीन दिवसांत मतदारांपर्यंत कोण अधिक पोहोचतो आणि त्याचे मन वळविण्यात कोण यशस्वी होतो, यावरच येथील निकाल अवलंबून असेलमतदारसंघातील एकूण गावे : ५२एकूण मते : १ लाख ७८ हजार ७३५पुरुष मतदार : ९२ हजार २२३महिला मतदार: ८५ हजार ८१२इतर : १३

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटक