शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:07 IST

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंतीसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज देणार यादी

संदीप आडनाईक सिंधुदुर्ग / कोल्हापूर : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.''सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्यातील कोअर आणि बफर झोनमधील तसेच तिलारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुमारे २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.पश्चिम घाट संवेदशनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी सुमारे २०९२ गावांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला.

नव्या यादीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित करून नव्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीव्र विरोध करून ती गावे न वगळण्याचे पत्र वनविभागाला दिले. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही गावे न वगळण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.ही २७ गावे वगळण्याचा आहे घाटसह्याद्री व्याघ्र प्रकल्प : कोल्हापूर : निवळे (कोअर क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र ता. शाहूवाडी), सांगली : मणदूर (बफर क्षेत्र, ता. शिराळा), व्याघ्र संवर्धन आराखडा : कोल्हापूर : मानोली, धनगरवाडी, येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), राधानगरी अभयारण्य क्षेत्र आणि राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र : सावर्डे, रामणवाडी, पाटपन्हाळा आणि पडसाळी (ता. राधानगरी) , वन्यजीव कॉरिडॉर : कोल्हापूर : भोगोली, पिलानी, कानूर खुर्द, (ता. चंदगड), सिंधुदुर्ग : असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवे माजगाव, सारमाले, तांबोळी (ता. सावंतवाडी)मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आज यादीवगळण्यात येणाऱ्या ३८८ गावांमधील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्य वन्यजीव विभागाला मिळालेले असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील वन्यजीवांसंदर्भातील या गावांची यादी आज, मंगळवारी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून मिळाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ गावांचा समावेश होतो. बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघ व हत्तींच्या कॉरिडॉरमधील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत आहे. अशा २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे.- सत्यजित गुजर,क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

टॅग्स :environmentपर्यावरणradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग