शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:07 IST

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंतीसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज देणार यादी

संदीप आडनाईक सिंधुदुर्ग / कोल्हापूर : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.''सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्यातील कोअर आणि बफर झोनमधील तसेच तिलारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुमारे २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.पश्चिम घाट संवेदशनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी सुमारे २०९२ गावांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला.

नव्या यादीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित करून नव्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीव्र विरोध करून ती गावे न वगळण्याचे पत्र वनविभागाला दिले. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही गावे न वगळण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.ही २७ गावे वगळण्याचा आहे घाटसह्याद्री व्याघ्र प्रकल्प : कोल्हापूर : निवळे (कोअर क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र ता. शाहूवाडी), सांगली : मणदूर (बफर क्षेत्र, ता. शिराळा), व्याघ्र संवर्धन आराखडा : कोल्हापूर : मानोली, धनगरवाडी, येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), राधानगरी अभयारण्य क्षेत्र आणि राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र : सावर्डे, रामणवाडी, पाटपन्हाळा आणि पडसाळी (ता. राधानगरी) , वन्यजीव कॉरिडॉर : कोल्हापूर : भोगोली, पिलानी, कानूर खुर्द, (ता. चंदगड), सिंधुदुर्ग : असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवे माजगाव, सारमाले, तांबोळी (ता. सावंतवाडी)मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आज यादीवगळण्यात येणाऱ्या ३८८ गावांमधील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्य वन्यजीव विभागाला मिळालेले असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील वन्यजीवांसंदर्भातील या गावांची यादी आज, मंगळवारी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून मिळाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ गावांचा समावेश होतो. बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघ व हत्तींच्या कॉरिडॉरमधील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत आहे. अशा २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे.- सत्यजित गुजर,क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

टॅग्स :environmentपर्यावरणradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग