शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:07 IST

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंतीसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज देणार यादी

संदीप आडनाईक सिंधुदुर्ग / कोल्हापूर : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.''सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्यातील कोअर आणि बफर झोनमधील तसेच तिलारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुमारे २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.पश्चिम घाट संवेदशनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी सुमारे २०९२ गावांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला.

नव्या यादीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित करून नव्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीव्र विरोध करून ती गावे न वगळण्याचे पत्र वनविभागाला दिले. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही गावे न वगळण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.ही २७ गावे वगळण्याचा आहे घाटसह्याद्री व्याघ्र प्रकल्प : कोल्हापूर : निवळे (कोअर क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र ता. शाहूवाडी), सांगली : मणदूर (बफर क्षेत्र, ता. शिराळा), व्याघ्र संवर्धन आराखडा : कोल्हापूर : मानोली, धनगरवाडी, येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), राधानगरी अभयारण्य क्षेत्र आणि राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र : सावर्डे, रामणवाडी, पाटपन्हाळा आणि पडसाळी (ता. राधानगरी) , वन्यजीव कॉरिडॉर : कोल्हापूर : भोगोली, पिलानी, कानूर खुर्द, (ता. चंदगड), सिंधुदुर्ग : असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवे माजगाव, सारमाले, तांबोळी (ता. सावंतवाडी)मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आज यादीवगळण्यात येणाऱ्या ३८८ गावांमधील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्य वन्यजीव विभागाला मिळालेले असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील वन्यजीवांसंदर्भातील या गावांची यादी आज, मंगळवारी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून मिळाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ गावांचा समावेश होतो. बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघ व हत्तींच्या कॉरिडॉरमधील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत आहे. अशा २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे.- सत्यजित गुजर,क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

टॅग्स :environmentपर्यावरणradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग