शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात नोंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:57 IST

नागरिकांनी यापुढे आॅनलाईन फसवणुकीची तक्रार थेट सायबर पोलीस ठाण्याकडे द्यावी, असे आवाहन निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात नोंद करापोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे आवाहन

कोल्हापूर : नागरिकांनी यापुढे आॅनलाईन फसवणुकीची तक्रार थेट सायबर पोलीस ठाण्याकडे द्यावी, असे आवाहन निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.

मोबाईल एसएमएस, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, आदी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यात आॅनलाईन फसवणूक, समाजात जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. जी. एस. टी. करप्रणालीमुळे बरेचसे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे, आॅनलाईन झाले आहेत. अशा व्यवहारांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू केले आहे. या ठिकाणी सायबर लॅब, विविध तांत्रिक साधनसामग्री व सॉफ्टवेअर्सद्वारे सायबर गुन्ह्यांची उकल केली जात आहे.सोशल मीडियामधून वेगवेगळे संदेश पाठवून समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न केले जात आहेत. काही अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे समाजात असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक सुशिक्षित लोक टीव्ही, वृत्तपत्रांतील बोगस जाहिरातींच्या आमिषाला बळी पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

जी. एस. टी. करप्रणालीमुळे बरेचसे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे, आॅनलाईन झाले आहेत. अशा व्यवहारांमध्ये गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. ते वेळीच रोखण्यासाठी सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध करण्याचे काम सायबर पोलीस ठाण्याद्वारे केले जात आहे.

सायबर गुन्हेगारांना शिक्षा लागण्यासाठी सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी विशेष प्रशिक्षित पोलीस अधिकारी व सहकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सामान्य नागरिकांची इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवणूक, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, मोबाईल व इतर माध्यमांतून होणारी महिला, युवतींची बदनामी व ब्लॅकमेलिंग, माध्यमांद्वारे होणाऱ्या तक्रारी दाखल करून त्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना अटक करण्याचे काम सायबर पोलीस ठाणे करीत आहे. त्यासाठी नागरिकांनी थेट तक्रारी सायबर विभागाकडे द्याव्यात. जेणेकरून सामान्य नागरिकांचे सायबर गुन्हेगारीबाबतचे अज्ञान दूर होऊन पोलीस व नागरिक यांच्यात विश्वासार्हता वाढीस लागेल.नागरिकांना दक्षता घ्यावीदूरध्वनीवरून तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करायची आहे, असे सांगून विचारलेल्या कोणत्याही बँकेविषयी माहिती, पिन नंबर, ओटीपी नंबर, सीव्हीव्ही नंबर, क्रेडिट, डेबिट कार्डवरील पासवर्ड नंबर अनोळखी व्यक्तीला देऊ नये. आॅनलाईन लॉटरी, नोकरीच्या भूलथापांना बळी पडून आॅनलाईन व्यवहार करू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या ई-मेल, फेसबुक रिक्वेस्ट, लिंक क्लिक, स्वीकारू नये.

मोबाईल, फेसबुक, ई-मेलचा काही लोक गैरफायदा घेऊ लागल्याने आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ हा विभाग सुरू केला आहे. नागरिकांनी यापुढे थेट पोलीस मुखालयातील सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार करावी,डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर