शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळेच ‘आंबेओहळ’चे पुनर्वसन रखडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 11:27 IST

१९९८ मध्ये मंजुरी मिळालेला हा प्रकल्प तब्बल २३ वर्षांनी पूर्ण झाला. त्यामुळे २९ कोटींचा प्रकल्प २२८ कोटींपर्यंत गेला. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच प्रकल्पाच्या पूर्णत्वाला आणि पुनर्वसनाला दिरंगाई झाली आहे.

राम मगदूम गडहिंग्लज : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ असा कायदा असतानाही आंबेओहोळ प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या वर्षी जूनमध्ये प्रकल्पात पाणी साठविण्यात आले आहे, तरीही एकूण ५१४ पैकी १३२ धरणग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे, परंतु आता पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांतून संताप व्यक्त होत आहे.

१९९८ मध्ये मंजुरी मिळालेला हा प्रकल्प तब्बल २३ वर्षांनी पूर्ण झाला. त्यामुळे २९ कोटींचा प्रकल्प २२८ कोटींपर्यंत गेला. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच प्रकल्पाच्या पूर्णत्वाला आणि पुनर्वसनाला दिरंगाई झाली आहे. त्याची किंमत प्रकल्पग्रस्तांबरोबरच लाभार्थी शेतकऱ्यांनाही मोजावी लागत आहे.

प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची क्षमता १२५० द.ल.घ.फू इतकी आहे. त्यातून गडहिंग्लज तालुक्यातील २,६१५ हेक्टर तर आजरा तालुक्यातील १,३१० मिळून एकूण ६,३५९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी आंबेओहोळ नाल्यावर कोल्हापूर पद्धतीचे ६ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी जागेच्या वादामुळे प्रलंबित आर्दाळ-उत्तूर दरम्यानच्या बंधाऱ्याचे काम आता सुरू झाले आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

  • एकूण : ८१७
  • स्वेच्छा पुनर्वसन घेतलेले : ३५७
  • पुनर्वसन पात्र : ५१४
  • पूर्णत जमीन वाटप झालेले : ८८
  • अंशत: जमीन वाटप झालेले : २९
  • पूर्णत: पॅकेज घेतलेले : २८६
  • पूर्णत: व जमीन घेतलेले : ४३
  • पूर्णत : पुनर्वसन झालेले : ४१७
  • अंशत : पुनर्वसन झालेले : २९
  • पुनर्वसन झालेले एकूण : ४४६
  • वाटलेली एकूण रक्कम : २२ कोटी ६६ लाख
  • पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन : ५० हेक्टर
  • मार्च, २०२२ अखेर प्रकल्पावर झालेला खर्च कोटीत : बांधकामासाठी-१०८.८२, भू-संपादन व पुनर्वसनासाठी - १०७.५१ एकूण २१६.३३ कोटी 

जबाबदारी टाळता येणार नाही

स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेला प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले. पाणी साठविण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचा शब्द त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जमीन व आर्थिक पॅकेजसाठी निधी आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून राज्यकर्त्यांची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर