शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

नियमित शेतकऱ्यांचे प्रोत्साहन लटकणार-:कोरोनामुळे राज्याचे अर्थव्यवस्था अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:06 IST

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होेते.

ठळक मुद्दे​​​​​​​ जिल्ह्यातील १.९७ लाख शेतकरी वंचित

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करताना कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या निर्णयानुसार एप्रिलपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करण्याचे नियोजन होते. मात्र ह्यकोरोनाह्णचे संकट इतके गडद झाल्याने राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळेही प्रोत्साहनपर अनुदान लटकणार, हे निश्चित असून कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकरी वंचित राहणार आहेत.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबर २०१९ अखेर दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होेते.

जानेवारीपासून कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे केली. त्यामुळे युती सरकारच्या काळापेक्षा आघाडी सरकारने राबवलेली कर्जमाफीची योजना वेगाने झाली. अवघ्या साठ दिवसांत कर्जमुक्तीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ३०३ कोटींची कर्जमाफी मिळाली तर दोन लाखांवरील थकबाकीदारांसाठी ह्यओटीएसह्ण योजना लागू केली, त्यातून २२४९ शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाखांचा लाभ मिळाला.

जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले. मात्र नियमित परतफेड करणारे शेतकरी अडकले आहेत. सरकारने घोषणा केली असली तरी ह्यकोरोनाह्णच्या संकटाशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा गुंतली आहे. त्यात गेली पावणेदोन महिने लॉकडाऊन सुरू असल्याने राज्याची अर्थव्यवस्था काहीशी खिळखिळीत झाली आहे. राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे म्हटले तर किमान १३०० हजार कोटी लागणार आहेत. आताच्या परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकरी हे नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत.

या शेतकऱ्यांची पीक कर्जाची सरासरी उचल आणि त्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान पाहता किमान ६०० कोटी रुपये लागतील. मात्र एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान लटकणार हे आता निश्चित झाले आहे.कर्जमुक्ती : आणखी ३१०० शेतकरी पात्र महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित ३१०० शेतकऱ्यांची नावे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहेत. या खात्यांचे लेखापरीक्षण करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. महापुरातील उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे मिळणार महापुरातील कर्जमाफी व अतिवृृष्टीतील नुकसानीचे पैसेही लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. संबंधित खात्यांचे लेखापरीक्षण सुरू असून यामध्ये सुमारे २८०० लाभार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी