शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सावधान! पावसाचा पॅटर्न बदलतोय; कोल्हापूरकरांना २५ जुलैची धास्ती, यंदा २०२१ चे रेकार्ड मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:22 IST

पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर : पूर्वी निसर्गाचे कालचक्र काहीसी ठरलेले असायचे. पण, अलीकडील पाच वर्षांत हे चक्र पूर्णपणे बदलल्याने त्याचा फटका सगळ्यांनाच बसू लागला आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या ५० दिवसांतच विक्रमी ६२२.५ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. हा पाऊस गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असून, जून-जुलैच्या सरासरीच्या ७७ टक्के आहे.यंदा वळीव पाऊस थांबला तोपर्यंत मान्सून सक्रिय झाल्याने खरिपाच्या पेरण्या थांबल्या होत्या. आतापर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धूळवाफ पेरण्या पूर्ण होतात, त्यानंतर मान्सून सक्रिय होतो. पण, यावर्षी शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेली ५० दिवस पाऊस सुरू आहे, धूळवाफ पेरण्या थांबल्या होत्या. जिथे शक्य आहे, तिथे भाताची रोप लागण शेतकऱ्यांनी करून घेतली आहे.पिके आकसली..सततच्या पावसाने जमिनीला वापसा नाही. या वातावरणाचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिके गारठली असून, त्याचा मोठा फटका ऊस पिकाला बसणार आहे.

कोल्हापूरकरांना २५ जूलैची धास्ती

मान्सूनमध्ये २५ जुलै आला की कोल्हापूरकरांचा ठोका वाढतो. दि. २५ जुलै २०२१ पासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आणि महापुराचा विळखा पडला. तेव्हापासून हा दिवस जवळ आला की नागरिकांना धास्तीच वाटते. यावर्षी २५ जुलैपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.यंदा २०२१ चे रेकार्ड मोडलेयंदा मान्सून वेळेत सक्रिय झाला आणि त्यामध्ये सातत्य राहिले. आठ-दहा दिवसांचा अपवाद वगळता सलग पाऊस राहिला आहे. यंदा जूनमध्ये ४१५, तर जुलैच्या २० दिवसांत २०७ असा ६२२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तुलनेत २०२१ मध्ये आतापर्यंत ५९०.८ मिलीमीटर पाऊस झाला होता.

२० जुलैपर्यंतचा तुलनात्मक पाऊस, मिलीमीटरमध्येवर्ष  - पाऊस

  • २०२१ - ५९०.८
  • २०२२ - ५९६.६
  • २०२३ - ३७३.६
  • २०२४ - ५७७.७
  • २०२५ - ६२२.५