शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या किंमतीत विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST

सुनील चौगले आमजाई व्हरवडे : शेतीमालाचे भाव स्थिर असताना रासायनिक खतांच्या दरात पाचशे रुपयांपासून सातशे रुपयापर्यंत विक्रमी दरवाढ ...

सुनील चौगले

आमजाई व्हरवडे : शेतीमालाचे भाव स्थिर असताना

रासायनिक खतांच्या दरात पाचशे रुपयांपासून सातशे रुपयापर्यंत विक्रमी दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार असून शेती व्यवसायाचे बजेट कोलमडणार आहे. या खत दरवाढीने शेतकरी बेहाल झाला आहे.

गेले दोन वर्षे स्थिर असणारे रासायनिक खताचे दर भरमसाठ वाढल्यामुळे शेती व्यवसायाला होणारा खर्च याचा मेळ बघता शेती व्यवसाय हा आतबट्यातच येणार हे वाढलेल्या किमतीवरून स्पष्ट होते.

उसाला प्रतिटन मिळणारा तीन हजार दर दिसत असला तरी या खत दरवाढीने हा तीन हजार दरसुध्दा परवडणारा नाही. त्यामुळे शेती कशी करायची हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे.

केंद्र सरकार खत कपंन्याना सबसिडी देते, मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने सर्वच खत कंपन्यानी दरवाढ केली आहे. सबसीडीतच वाढ केली तरच भविष्यात खताची दरवाढ कमी होऊ शकते. सध्या पाचशे रुपयापासून सातशे रुपये एवढी विक्रमी दरवाढ झाली आहे. आता खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. मृग नक्षत्र जवळ येत असून खरीप हंगामाला व मृग नक्षत्रात शेतकरी खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, मात्र या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे बजेटच कोलमडून पडणार आहे.

शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी एकरी साठ हजार खर्च

प्रती टन तीन हजार रुपये ऊसाला दर दिसत असला तरी एक एकरात उसाचे उत्पन्न काढण्यासाठी नांगरट रासायनिक खत भांगलन उसाचे बियाणे व मशागत याचा विचार करता शेतकऱ्यांना एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो त्यातच एखादे निसर्गाचे अस्माणी संकट आले तर शेतकरी पूर्ण उद्ववस्थच होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते याचा राज्यकर्त्यानी विचार करावा तरच शेतकरी जगणार आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्र सरकारला पत्र

रासायनिक खतांच्या भरमसाठ दरवाढीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. राज्यात कोरोणाची महामारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील खंताचे दर कमी करावे अशी मागणी करत राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनीकेंद्र सरकारला बारा एप्रिलला पत्र पाठवले आहे

कोट

शेतीमालाचे दर स्थिर असताना खताची झालेली दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आता एफआरपीमध्ये वाढ करून आधारभूत किमती वाढायला पाहिजेत तरच शेतकरी तरेल, अन्यथा शेतकरी उद‌्ध्वस्त होईल, याचा राज्यकर्त्यानी विचार करावा नाहीतर शेती व्यवसाय टिकणार नाही.

जांलदर पाटील प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना