शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खरंच अन्नातून विषबाधा की विषप्रयोगाचा प्रयत्न ?; कोल्हापूर जिल्ह्यात चौघांचा बळी, तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:24 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. मांडरेतील एकजण अत्यवस्थ आहे. या घटना अन्नातील विषबाधेमुळे झाल्या की कोणी घातपाताने विषप्रयोग केला? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्हीही शक्यता घातक असल्याने यातील वस्तुस्थिती समोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.मांडरे येथे २० दिवसांपूर्वी मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि एकाच कुटुंबातील तीन भावंडांसह वडिलांना विषबाधा झाली. यातील वडील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय ६४) यांचा उपचारादरम्यान आठवड्यापूर्वी मृत्यू झाला. कृष्णात पाटील आणि रोहित पाटील या दोघांचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. लहान भाऊ प्रदीप पाटील याची प्रकृती अत्यवस्थ आहे. पाटील कुटुंबातील कृष्णात पाटील यांची पत्नी गंगा आणि मुलगी ओवी या दोघी सुखरूप आहेत. कौटुंबिक वादातून गंगा हिनेच कुटुंबीयांवर विषप्रयोग केला असावा, असा ग्रामस्थांचा संशय आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलिसांसमोर केली आहे.परंतु, त्याबद्दल अजून तरी ठोस पुरावा हाती न आल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू ठेवला आहे. ती मूकबधिर असल्याने चौकशीत पोलिसांना मर्यादा येत आहेत. विषबाधा की विषप्रयोग याचा छडा लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.चिमुकल्यांचा हकनाक बळीमांडरेतील प्रकरण ताजे असतानाच चिमगाव येथे मुदत संपलेला कप केक खाल्लेल्या चिमुकल्या भावंडांचा मंगळवारी मृत्यू झाला. सुुरूवातीला आईस केक खाल्ल्याची चर्चा होती. नंतर कप केक खाल्ल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी दगावलेल्या मुलाची उत्तरीय तपासणी न करताच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितले. कप केकमधून विषबाधा झाली असेल तर पोलिस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना केकचे उत्पादक आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचून याचा तपास करावा लागेल. कप केकमधून विषबाधा झाली नसेल तर अन्य कारणांचा शोध घेण्याची गरज आहे.

दोन्ही शक्यता घातकजेवण आणि कप केकमधून विषबाधा झाली असेल तर त्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करावी लागेल. त्याच बॅचमधील कप केकची विक्री रोखावी लागेल. घातपाताने विषप्रयोग झाला असे, तर संशयितांचा शोध घेऊन अमानुष कृत्याबद्दल त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवावे लागेल. दोन्ही शक्यता घातक असल्याने याच्या मुळाशी पोहोचण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.संशय बळावतोयमांडरे येथे १५ नोव्हेंबरला मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्यानंतर तिघांना त्रास सुरू झाला. चिकन न खाल्लेले प्रदीप पाटील हे दुसऱ्या दिवशी जेवल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. चिमगाव येथे मुलांनी खाल्लेले कप केक खराब असतील तर याचदरम्यान त्याच बॅचमधील इतर ठिकाणी कप केक खाणाऱ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय हा केक कुणी आणि कोठून आणून दिला? याचा शोध घेतल्यास घटनेचा उलगडा होऊ शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यूPoliceपोलिस