शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी फेरआरक्षण काढण्यात येणार, तिसऱ्यांदा होणार प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:09 IST

सुधारित अधिसूचनेनुसार तिसऱ्यांदा होणार प्रक्रिया

कोल्हापूर : सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील १,०२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोमवारी (दि.२१) तिसऱ्यांदा फेरआरक्षण काढण्यात येणार आहे. यापूर्वी ओबीसी गटातील वाढलेल्या चार जागांसाठीच चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचेआरक्षण काढले होते; पण शासनाच्या निर्देशाप्रमाणे अधिसूचनेत बदल झाल्याने आधीची अधिसूचना रद्द झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील आरक्षण काढले जाणार असून, त्यामुळे चिठ्ठ्या टाकून काढले गेलेले आरक्षणच बदलणार आहे. गावातील राजकीय समीकरणेही बदलणार असून, इच्छुक पुन्हा गॅसवर गेले आहेत.राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील करवीर, आजरा, शाहूवाडी व राधानगरी या चार तालुक्यांमधील सर्वसाधारण गटातील सरपंचपदाचे आरक्षण प्रत्येकी एक जागा कमी होऊन नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये वाढविण्यात आली होती. त्यानुसार २६ जूनला या चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. मात्र, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागाने सर्वच तालुक्यांना नव्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सूचना पाठवली आहे. यानुसार जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १,०२६ गावांमधील सरपंचपदाचे आरक्षण २१ तारखेला नव्याने काढले जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे शासनाने पूर्वी काढलेल्या अधिसूचनेत बदल केले गेले. त्यामुळे मूळ अधिसूचना रद्द करून ७ जुलै रोजीच्या मार्गदर्शनपत्रानुसार नव्याने सरपंच आरक्षण काढावे लागणार आहे. मात्र, १३ जूनच्या अधिसूचनेनुसार सरपंच आरक्षणात बदल होणार नसला, तर ज्याठिकाणी चिठ्ठ्या टाकून सरपंच आरक्षण काढण्यात आले आहे, तेथे मात्र आरक्षण बदलणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालये, पंचायत समिती सभागृहांमध्ये दुपारी १२:३० वाजता आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे.

आरक्षित प्रवर्ग : संख्या

  • अनुसूचित जाती : १३८ (६९ महिला)
  • अनुसूचित जमाती ७ (४ महिला)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७७ (१३९ महिला)
  • सर्वसाधारण : ६०४ (३०२ महिला)

तालुका : ग्रामपंचायती : अनुसूचित जाती : अनुसूचित जमाती : मागास प्रवर्ग : सर्वसाधारणपन्हाळा : १११ : १६ : ० : ३० : ६५शाहूवाडी : १०६ : १३ : १ : २९ : ६३करवीर : ११८ : १९ : १ : ३२ : ६६गगनबावडा : २९ : ५ : ० : ८ : १६कागल : ८३ : १२ : ० : २२ : ४९राधानगरी : ९८ : ११ : ० : २७ : ६०हातकणंगले : ६१ : १२ : १ : १६ : ३२शिरोळ : ५२ : १० : २ : १४ : २६आजरा : ७३ : ८ : ० : २० : ४५भुदरगड : ९७ : ११ : ० : २६ : ६०गडहिंग्लज : ८९ : १० : १ : २४ : ५४चंदगड : १०९ : ११ : १ : २९ : ६८एकूण : १०२६ : १३८ : ७ : २७७ : ६०४

शासन निर्देशानुसार आधीच्या अधिसूचनेत बदल झाल्याने मूळ अधिसूचना रद्द झाली आहे. त्यामुळे नव्या अधिसूचनेनुसार सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण काढले जाईल. - डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी महसूल