शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: कार्यकर्ते गेले दूर, रेडिमेड नेत्यांचीही आता सोडचिठ्ठी; राजू शेट्टींनी काय मिळवले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:34 IST

कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..

शरद यादवकोल्हापूर : हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी अखेर स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीत प्रवेश देऊन तिकीट देणारे राजू शेट्टी यांना जवळच्या कार्यकर्त्यांचा रोष पत्कारावा लागला होता. या निर्णयाला विरोध करत वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीतून बाहेर पडत तोफ डागली होती. ज्या मिणचेकरांसाठी संघटनेत भगदाड पडले ते हातात धनुष्यबाण घेणार असतील तर शेट्टी यांनी यातून मिळवले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकारणाच्या बेरीज - वजाबाकीत चळवळीच्या गळ्याला नख लावले जात असल्याने शेतकऱ्यांचा आवाज क्षीण होत असल्याचे कटु वास्तव समोर येत आहे.

शरद जोशी यांनी लावलेल्या शेतकरी संघटनेच्या रोपट्याला यशाची फळे आणण्यासाठी ज्यांनी काम केले त्यात राजू शेट्टी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. २००३ नंतर पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी संघटनेने झंझावता तयार केला होता. ऊस दराचे अर्थकारण सोप्या भाषेत मांडत साखर कारखानदारांचे वाभाडे काढण्याचे काम स्वाभिमानीने केले. यामुळेच उसाला चांगला दाम मिळाला, दुधाचे दरही वधारले, शेतकऱ्यांच्या जीवनात चार सुखाचे दिवस आले. यामुळेच शेतकऱ्यांनीही आपला आवाज म्हणून राजू शेट्टी यांना जिल्हा परिषद, विधानसभा व्हाया लोकसभेत पाठवून कामाची पोचपावती दिली. २००९ व २०१४ मध्ये शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले; पण शेतकऱ्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविल्याने विरोधकांचा प्रयत्न तोकडा पडला. जो पैलवान मातीत हारत नाही त्याला हातात हात देऊन पाडायचे असते, असे सांगितले जाते. २०१९ मध्ये शेट्टींना महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने मातीत न हारणारा शेतकरी योद्धा हातात हात देऊन पराभूत झाला. येथूनच स्वाभिमानीचे बुरे दिन सुरू झाले. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळ आजमावत शेट्टींनी पुन्हा शेतकऱ्यांना साद घातली; परंतु ‘बुंद से गये ओ हौदासे नही आता’ या न्यायाने लोकांनी त्यांना नाकारले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे राबणारे वैभव कांबळे यांना ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवून शिवसेनेतून आलेले मिणचेकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज हाेऊन वैभव कांबळे बाहेर पडले. विधानसभेला मिणचेकरांचा पराभव झाला व कांबळे यांनीही संघटना सोडली. या सर्व राजकारणातून शेट्टी यांनी मिळवले काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

तिकिटासाठी हे आले अन् गेलेभारत भालके, संजय घाटगे, दत्ता घाटगे, मनोज घोरपडे, अमर यशवंत पाटील, विशाल पाटील, प्रमोद कदम व आता सुजित मिणचेकर यांनी निवडणुकीपुरता संघटनेचा बिल्ला छातीवर लावला व नंतर तो कधी काढला हे शेट्टींनाही कळले नाही.

कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..करपलेल्या चेहऱ्याच्या कार्यकर्त्यांना संधी देणार, असे उठता बसता सांगणारे शेट्टी प्रत्यक्षात तसे वागतात का, याचे चिंतन करावे. कारण एक कार्यकर्ता तयार व्हायला दहा वर्षे लागतात. या विधानसभा निवडणुकीत जालंधर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील यांनी स्वाभिमानीशी फारकत घेतली. ज्यांना निवडणुकीसाठी आयात केले तेही सोडून जात असतील कष्टकऱ्यांची ही चळवळ वाढवणार कोण याचे उत्तर शेट्टी यांनीच द्यावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना