शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
5
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
6
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
7
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
8
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
9
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
10
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
11
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
13
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
14
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
15
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
16
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
17
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
18
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
19
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
20
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी विरुद्ध भाजप असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:32 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू मैदानात उतरणार आहे. गेल्या तिन्हीवेळेला त्यांच्याविरोधात नवीन उमेदवार रिंगणात उतरला आहे. यावेळेला शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांचे नाव निश्चित मानले जाते. भाजपकडूनही ही जागा आपल्याला मिळावी, असे प्रयत्न सुरू होते; परंतु शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडला नसल्याने माने यांना संधी मिळू शकते. देशाच्या राजकारणात खासदार शेट्टी गेली तीन वर्षे सातत्याने मोदींच्या विरोधी बोलत आहेत; त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी भाजप या मतदारसंघात ताकद पणाला लावणार, असेच चित्र आहे. शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करतात का, याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे.ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून शेट्टी यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार द्यायचा असा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याही नावाची मध्यंतरी चाचपणी झाली होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे तर वारंवार मीच लढणार असे स्वत:च जाहीर करीत होते; परंतु शिवसेनेबरोबर युती झाल्यावर त्यांच्या कलाने घेणे भाजपला भाग पडले. त्यामुळे या पक्षाने या जागेसाठी फारसे ताणवून धरलेले नाही. सदाभाऊ रिंगणात उतरले असते तर ‘शेट्टी विरुद्ध खोत’ लढत रंगतदार झाली असती व खरेच शेतकरी कुणाला पाठबळदेतात याचाही फैसला झाला असता. मोदी यांना घरात बसविण्याची भाषा सर्वांत पहिल्यांदा शेट्टी यांनी सुरू केली.महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधून मोदी सरकारविरोधात रान उठविण्याचे काम त्यांनी केले. भाजपविरोधात काँग्रेस पक्ष जेवढ्या त्वेषाने रस्त्यांवर उतरला नाही, तेवढ्या त्वेषाने शेट्टी रस्त्यांवर उतरले. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे, हे शेतकऱ्यांच्या मनांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत, याचा राग भाजपला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव हे भाजपचे राज्यस्तरीय लक्ष्य आहे. या मतदारसंघातील कोणतेही मोठी संस्था, एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. या मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत; परंतु त्यांच्याशी संघर्ष करून शेट्टी यांनी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात यश मिळविले आहे. गेल्या निवडणुकीत ते महाआघाडीचे महत्त्वाचे घटक होते. या निवडणुकीत ते काँग्रेस आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद त्यांच्यामागे असेल. ‘ज्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही कायमच शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही कसे बसणार?’ अशी विचारणा त्यांना होणार आहे. शेट्टी यांनी जेव्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हाच ‘लोकमत’ने आगामी निवडणुकीत आमदार जयंत पाटील व प्रकाश आवाडे हेच शेट्टी यांचे प्रचारप्रमुख असतील, असे म्हटले होते. आता घडामोडीही त्याच वळणावर आहेत. मागच्या निवडणुकीत शेट्टी यांची जात काढण्याचा प्रयत्न झाला; परंतुत्यातून त्यांचे मताधिक्य वाढल्याने तो मुद्दा काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.शिवसेनेने धैर्यशील माने यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणास मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. या मतदारसंघात युतीचे तब्बल पाच आमदार आहेत. हा मूळ मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचा आहे. धैर्यशील हे त्यांचे नातू आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळेत्यांची बांधीलकी आपल्याला कामी येईल या विचाराने त्यांनी शड्डू ठोकला आहे.गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मतेमतदार संघ राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडेशाहूवाडी १०६१९३ ६३२९३हातकणंगले १२७०५० ७८९१८इचलकरंजी ९७६९१ ७७८७९शिरोळ ११११२६ ८७५७३इस्लामपूर ९५३९२ ७१९४७शिराळा १०१७३९ ८२३०५एकूण मते ६४०४२८ ४६२६१८