शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

राजू शेट्टी विरुद्ध भाजप असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:32 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू मैदानात उतरणार आहे. गेल्या तिन्हीवेळेला त्यांच्याविरोधात नवीन उमेदवार रिंगणात उतरला आहे. यावेळेला शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांचे नाव निश्चित मानले जाते. भाजपकडूनही ही जागा आपल्याला मिळावी, असे प्रयत्न सुरू होते; परंतु शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडला नसल्याने माने यांना संधी मिळू शकते. देशाच्या राजकारणात खासदार शेट्टी गेली तीन वर्षे सातत्याने मोदींच्या विरोधी बोलत आहेत; त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी भाजप या मतदारसंघात ताकद पणाला लावणार, असेच चित्र आहे. शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करतात का, याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे.ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून शेट्टी यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार द्यायचा असा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याही नावाची मध्यंतरी चाचपणी झाली होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे तर वारंवार मीच लढणार असे स्वत:च जाहीर करीत होते; परंतु शिवसेनेबरोबर युती झाल्यावर त्यांच्या कलाने घेणे भाजपला भाग पडले. त्यामुळे या पक्षाने या जागेसाठी फारसे ताणवून धरलेले नाही. सदाभाऊ रिंगणात उतरले असते तर ‘शेट्टी विरुद्ध खोत’ लढत रंगतदार झाली असती व खरेच शेतकरी कुणाला पाठबळदेतात याचाही फैसला झाला असता. मोदी यांना घरात बसविण्याची भाषा सर्वांत पहिल्यांदा शेट्टी यांनी सुरू केली.महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधून मोदी सरकारविरोधात रान उठविण्याचे काम त्यांनी केले. भाजपविरोधात काँग्रेस पक्ष जेवढ्या त्वेषाने रस्त्यांवर उतरला नाही, तेवढ्या त्वेषाने शेट्टी रस्त्यांवर उतरले. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे, हे शेतकऱ्यांच्या मनांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत, याचा राग भाजपला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव हे भाजपचे राज्यस्तरीय लक्ष्य आहे. या मतदारसंघातील कोणतेही मोठी संस्था, एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. या मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत; परंतु त्यांच्याशी संघर्ष करून शेट्टी यांनी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात यश मिळविले आहे. गेल्या निवडणुकीत ते महाआघाडीचे महत्त्वाचे घटक होते. या निवडणुकीत ते काँग्रेस आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद त्यांच्यामागे असेल. ‘ज्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही कायमच शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही कसे बसणार?’ अशी विचारणा त्यांना होणार आहे. शेट्टी यांनी जेव्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हाच ‘लोकमत’ने आगामी निवडणुकीत आमदार जयंत पाटील व प्रकाश आवाडे हेच शेट्टी यांचे प्रचारप्रमुख असतील, असे म्हटले होते. आता घडामोडीही त्याच वळणावर आहेत. मागच्या निवडणुकीत शेट्टी यांची जात काढण्याचा प्रयत्न झाला; परंतुत्यातून त्यांचे मताधिक्य वाढल्याने तो मुद्दा काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.शिवसेनेने धैर्यशील माने यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणास मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. या मतदारसंघात युतीचे तब्बल पाच आमदार आहेत. हा मूळ मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचा आहे. धैर्यशील हे त्यांचे नातू आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळेत्यांची बांधीलकी आपल्याला कामी येईल या विचाराने त्यांनी शड्डू ठोकला आहे.गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मतेमतदार संघ राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडेशाहूवाडी १०६१९३ ६३२९३हातकणंगले १२७०५० ७८९१८इचलकरंजी ९७६९१ ७७८७९शिरोळ ११११२६ ८७५७३इस्लामपूर ९५३९२ ७१९४७शिराळा १०१७३९ ८२३०५एकूण मते ६४०४२८ ४६२६१८