शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

राजू शेट्टी विरुद्ध भाजप असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:32 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू मैदानात उतरणार आहे. गेल्या तिन्हीवेळेला त्यांच्याविरोधात नवीन उमेदवार रिंगणात उतरला आहे. यावेळेला शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांचे नाव निश्चित मानले जाते. भाजपकडूनही ही जागा आपल्याला मिळावी, असे प्रयत्न सुरू होते; परंतु शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडला नसल्याने माने यांना संधी मिळू शकते. देशाच्या राजकारणात खासदार शेट्टी गेली तीन वर्षे सातत्याने मोदींच्या विरोधी बोलत आहेत; त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी भाजप या मतदारसंघात ताकद पणाला लावणार, असेच चित्र आहे. शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करतात का, याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे.ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून शेट्टी यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार द्यायचा असा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याही नावाची मध्यंतरी चाचपणी झाली होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे तर वारंवार मीच लढणार असे स्वत:च जाहीर करीत होते; परंतु शिवसेनेबरोबर युती झाल्यावर त्यांच्या कलाने घेणे भाजपला भाग पडले. त्यामुळे या पक्षाने या जागेसाठी फारसे ताणवून धरलेले नाही. सदाभाऊ रिंगणात उतरले असते तर ‘शेट्टी विरुद्ध खोत’ लढत रंगतदार झाली असती व खरेच शेतकरी कुणाला पाठबळदेतात याचाही फैसला झाला असता. मोदी यांना घरात बसविण्याची भाषा सर्वांत पहिल्यांदा शेट्टी यांनी सुरू केली.महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधून मोदी सरकारविरोधात रान उठविण्याचे काम त्यांनी केले. भाजपविरोधात काँग्रेस पक्ष जेवढ्या त्वेषाने रस्त्यांवर उतरला नाही, तेवढ्या त्वेषाने शेट्टी रस्त्यांवर उतरले. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे, हे शेतकऱ्यांच्या मनांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत, याचा राग भाजपला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव हे भाजपचे राज्यस्तरीय लक्ष्य आहे. या मतदारसंघातील कोणतेही मोठी संस्था, एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. या मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत; परंतु त्यांच्याशी संघर्ष करून शेट्टी यांनी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात यश मिळविले आहे. गेल्या निवडणुकीत ते महाआघाडीचे महत्त्वाचे घटक होते. या निवडणुकीत ते काँग्रेस आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद त्यांच्यामागे असेल. ‘ज्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही कायमच शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही कसे बसणार?’ अशी विचारणा त्यांना होणार आहे. शेट्टी यांनी जेव्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हाच ‘लोकमत’ने आगामी निवडणुकीत आमदार जयंत पाटील व प्रकाश आवाडे हेच शेट्टी यांचे प्रचारप्रमुख असतील, असे म्हटले होते. आता घडामोडीही त्याच वळणावर आहेत. मागच्या निवडणुकीत शेट्टी यांची जात काढण्याचा प्रयत्न झाला; परंतुत्यातून त्यांचे मताधिक्य वाढल्याने तो मुद्दा काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.शिवसेनेने धैर्यशील माने यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणास मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. या मतदारसंघात युतीचे तब्बल पाच आमदार आहेत. हा मूळ मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचा आहे. धैर्यशील हे त्यांचे नातू आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळेत्यांची बांधीलकी आपल्याला कामी येईल या विचाराने त्यांनी शड्डू ठोकला आहे.गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मतेमतदार संघ राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडेशाहूवाडी १०६१९३ ६३२९३हातकणंगले १२७०५० ७८९१८इचलकरंजी ९७६९१ ७७८७९शिरोळ ११११२६ ८७५७३इस्लामपूर ९५३९२ ७१९४७शिराळा १०१७३९ ८२३०५एकूण मते ६४०४२८ ४६२६१८