शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 11:44 IST

५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूरच्या मतदारांनी २०१४ ला धडा शिकविल्याने ते २०१९ च्या महापुराच्या मोर्चात सहभागी होते. त्यानंतर आम्ही २०२१ ला पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत मोर्चे काढले, त्यामध्ये मंत्री पाटील यांनी दिलेल्या आश्वसनातील काय पाळले? आता त्यांच्या तोंडाला कुलूप का? असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

शेती पंपांसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांना गुंठ्याला ९५० रुपये देतो म्हणून सांगणाऱ्या मंत्र्यांची तोंडे आता बंद का आहेत? शेतकऱ्यांचे घर-दार, जमिनी जाऊन धरणे उभारली. त्या धरणातील पाण्यावर वीज तयार करता, मग त्यावर आमचा हक्क नाही का? वीज निर्मितीसाठी २१ पैसे युनिटला खर्च येतो आणि तीच वीज सहा रुपयांनी विकली जाते.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी जसे तुम्हाला खुर्चीवर बसविले आहे, तसे ते खालीही खेचू शकतात. महावितरणने शेतकऱ्यांना लुटले असून, पन्नास वर्षांत एकही खांब बदलला नाही. मात्र, महिन्याला स्थिर आकार घेतला जातो. तेरा गुंठ्यांना १७ हजार वीज बिल शेतकऱ्याला आले, त्याने करायचे काय? आगामी काळात एकोप्याने पुढे जाण्याची गरज आहे. पक्षाचे झेंडे फेका आणि शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीच्या झेंड्याखाली या.

राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने राजकारण करतो म्हणणारे शरद पवार यांनी कुटील राजकारण केल्यानेच आतापर्यंत त्यांना ५० पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाहीत. एका पराभवाने राजू शेट्टी यांनी खचून न जाता शेतकऱ्यांसाठी पुन्हा ताकदीने लढाई करायची आहे. यावेळी भरत बँकेचे अध्यक्ष भरत मोरे, जयकुमार कोल्हे, सागर कोंडेकर, अजित पोवार, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

‘एन. डी’ चे ओझे वाहणारे ‘लमाण’ व्हा

ज्येष्ठ दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्या जाण्याने चळवळीत पोकळी तयार झाली असून, त्यांचे विचार व चळवळीचे ओझे वाहणारे ‘लमाण’ राजू शेट्टी यांनी व्हावे, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.

रस्ताही कंटाळला असेल

गेली वीस वर्षे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो मोर्चे काढले, मात्र प्रश्न सुटले नाहीत. आता हा रस्ताही कंटाळला असेल, मात्र राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी सुचत नसल्याची टीका शेट्टी यांनी केली.

‘आसूड’, झेंडे अन् घोषणाबाजी

मोर्चातील शेतकऱ्यांच्या हातातील ‘स्वाभिमानी’च्या झेंड्यांनी परिसर फुलून गेला होता. अधूनमधून ‘आसुडा’चा आवाज व घोषणांनी परिसर दणाणून जात होता.

५० हजारांची नुसती चर्चा... म्हणून मोर्चा.

‘तिन्ही पक्षांचे सरकार, मुंबईत त्यांचे विद्यालय, बारामतीत त्यांचे मुख्याध्यापक आणि किराणाच्या दुकानांत त्यांची मद्यालये’ तर ‘५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’ या घोषणांना शेतकऱ्यांनी टाळ्यांची दाद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRaju Shettyराजू शेट्टी