शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

राजर्षी शाहू स्मृती जागर: प्रशासनात सर्व समाजाला संधी देणारा उत्तम प्रशासक राजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:47 IST

राज्याच्या नोकरशाहीवर मूठभर लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची फार मोठ्या प्रमाणावर सोय नव्हती, त्यामुळे सत्ता हाती आल्यानंतर मूलभूत सुधारणा करण्याचा व प्रशासनाची पुनर्रचना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात आधुनिक तत्त्वांचा वापर केला.

डॉ. अशोक चौसाळकर

राजर्षी शाहू महाराज हे आदर्श व कुशल प्रशासक होते. त्यांनी समानतेचे तत्त्व समोर ठेवून प्रशासकीय यंत्रणा उभी केली. ठराविकांची मक्तेदारी मोडून काढत ती अंमलातही आणली.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्रशासन व्यवस्थेत मूलगामी बदल घडवून आणले. ते पदारूढ होण्यापूर्वी असंतोष व अस्वस्थतेचे वातावरण होते. राज्य कारभारात जुनीच व्यवस्था वापरली जात होती. राज्याच्या नोकरशाहीवर मूठभर लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची फार मोठ्या प्रमाणावर सोय नव्हती, त्यामुळे सत्ता हाती आल्यानंतर मूलभूत सुधारणा करण्याचा व प्रशासनाची पुनर्रचना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात आधुनिक तत्त्वांचा वापर केला. त्यावेळी कोल्हापूर संस्थानातील नोकरशाहीवर एका जातीचीच मक्तेदारी होती. ही गोष्ट सर्वांना समान संधीच्या तत्त्वाच्या विरोधातील होती.

प्रशासनात राज्यातील सर्व वर्गाचा सहभाग असेल तर एकतेची भावना बळकट होईल आणि लोकांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, असे शाहू महाराजांचे धोरण होते. त्यातूनच त्यांनी सर्व मागास जातीसाठी प्रशासनातील ५० टक्के टक्के जागा राखीव केल्या. शिक्षण मोफत आणि सक्तीचे करून शिक्षणाचा प्रसार केला. यातून प्रशिक्षित नोकर काम करण्यास मिळतील, हा उद्देश होता. सुरुवातीस काही काळ त्रास होईल; पण कालांतराने त्याचा इष्ट परिणाम होईल. कारण विकासाची संधी मिळताच समाजातील गुणवान कर्तबगार माणसे मिळतात, अशी शाहू महाराजांची धारणा होती. समाजातील सामर्थ्यवान लोक फायदा उठवू नयेत म्हणून मागास समाजासाठी आरक्षण देऊन प्रशासनातील सहभाग वाढवला.कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग्य माणसांची निवड गरजेची आहे. नाही तर काम पुढे सरकत नाही म्हणून शाहू महाराजांनी दिवाणबहाद्दर सबनीस, भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे यांच्यासारख्या कर्तबगार माणसांची नेमणूक केली आणि त्यांच्याकडून आपली उद्दिष्टे साध्य करून घेतली. सरंजामी व्यवस्थेचे आणखी एक लक्षण म्हणजे वतन व्यवस्था. संस्थानात कुलकर्णी वतन होते. ग्रामीण भागातील महसूल व्यवस्था त्यांच्या ताब्यात होती. ते मोठ्या प्रमाणावर सत्तेचा गैरवापर करतात आणि वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे संबंध असल्यामुळे रयतेवर अन्याय होत होता, ही व्यवस्था कार्यक्षम नव्हती. म्हणून महाराजांनी कुलकर्णी वतन रद्द केले व त्या जागी पगारी तलाठ्यांची गुणवत्तेच्या आधारावर नियुक्ती केली. यामुळे वंशपरंपरेने नेमणुकीतून येणारी जातीय मक्तेदारी माेडीत निघाली.

जुन्या व्यवस्था रद्द होऊन जास्त कार्यक्षम आणि आधुनिक तत्त्वावर आधारित व्यवस्था उभी राहिली. शाहू महाराजांच्या या धाेरणास मोठ्या प्रमाणावर विरोध झाला; पण विरोधाला न जुमानता त्यांनी धोरण अंमलात आणले. शाहूंनी प्रशासकीय असो की सामाजिक, धार्मिक ज्या म्हणून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्कालीन समाजव्यवस्थेने कडाडून विरोध केला; परंतु म्हणून त्यांनी या सुधारणांचा आग्रह सोडला नाही, हेदेखील त्यांचे मोठेपणच आहे.

निर्दोष कायदे

उत्तम प्रशासनासाठी निर्दोष कायदे हवेत, या गरजेतून त्यांनी कायद्यांची चोख अंमलबजावणीकडे लक्ष दिले. त्यांना अपेक्षित असणारी सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय सुधारण्यासाठी त्यांनी कायद्यामधील सुधारणांचा उपयोग करून घेतला. कौटुंबिक हिंसाचाराविरुद्धदेखील त्यांनी कायदा केला. त्याची काटेकोर अंमलबजावणी करणारी यंत्रणाही उभी केली. त्याकाळी कौटुंबिक हिंसाचाराचा विचार करणारा आणि त्यासाठी कायदा करणारा हा राजा काळाच्या किती पुढे पाहत होता, हेच त्यातून दिसून येते.(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक व विचारवंत आहेत.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती