शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चंद्रकांतदादा, आता कोणत्या तोंडाने मते मागता..?, खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:40 IST

कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

कोल्हापूर : पाच वर्षे तुम्ही पालकमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री होता, तेव्हा कोल्हापूर शहर, जिल्ह्याच्या विकासाठी काय केले? सत्तेत असताना तुम्ही येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला दमडीचीही मदत केली नाही. ते आता कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी येथे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.

शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिवाजी पेठेत जे ठरते, ते राज्यात आणि देशात पसरते. यामुळे शिवाजी पेठेेने भरघोस मते देऊन जयश्री जाधव यांना आमदार करावे. कोल्हापूरला छत्रपती ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्याच भूमीत विरोधकांकडून एका प्लंबरचे, इलेक्ट्रिशियनचे काम त्यांच्या पत्नीला जमते का ? ज्यांचे काम त्यांनीच करावे, असे सांगत महिलांचा अवमान केला आहे. त्यांना शिवाजी पेठेतील महिलांनी धडा शिकवावा.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, सत्तेचा माज आणि लालसेपोटी भाजपने उत्तरची पोटनिवडणूक लादली. त्यांच्या विजयाचा वारू कोल्हापूरची स्वाभिमानी जनता निश्चितपणे रोखणार आहे. जाती, जातीमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हे काम शिवाजी पेठेतील मतदार निश्चितपणे करतील.क्षीरसागर म्हणाले, पालकमंत्री असताना गणेशोत्सव बंद पाडण्याचे काम केलेले आता मते मागत फिरत आहेत. त्यांना कोल्हापूरची जनता हिमालयात पाठवतील.

यावेळी उमेदवार जयश्री जाधव यांनी दिवंगत चंद्रकांत जाधव यांची अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन केले. माजी आमदार सुरेश साळोखे, भारती पोवार यांची भाषणे झाली. सभेस शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी महापौर सई खराडे, आर. के. पोवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, संजय पवार, सरला पाटील, शिवाजी जाधव, उत्तम कोराणे, सचिन चव्हाण, विक्रम जरग, अजय इंगवले, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांची कदमवाडीतही सभा झाली.

शिवाजी पेठेचं ठरलंय..यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी शिवाजी पेठेचं ठरलयं, जयश्री जाधव यांना आमदार करायचं, असे सांगितले.

ज्योतिषीची पुणेवारी

कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेchandrakant patilचंद्रकांत पाटील