शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:34 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता.

-प्रा. डॉ. प्रकाश पवार, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता. हा विचार महाराष्ट्रामध्ये खूप खोलवर रुजलेला आहे. हा विचार भारताच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. प्रातिनिधिक लोकशाही, लोकशाहीतील सामाजिक न्याय, लोकशाहीतील सार्वजनिक धोरण आणि कल्याणकारी राज्य अशी उदाहरणे त्यांच्या लोकशाही संकल्पनेबद्दलची आहेत.

प्रतिनिधित्वाची संकल्पना

शाहू महाराजांना प्रतिनिधित्वाची संकल्पना मान्य होती. त्यांनी त्यांच्या राज्यसंस्थेत आणि राज्य कारभारात जवळपास सर्वच समाजाला प्रतिनिधित्व मिळेल, अशी काळजी घेतली होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य केले होते. या गोष्टीचे प्रतीक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव परिषद आहे. राज्य कारभार, प्रशासनामध्ये समतोल नेतृत्व आणि सर्वच समाजांमधील नेतृत्वाला त्यांनी सामावून घेतले होते. त्यांनी लोकशाहीला समावेशन हा नवीन अर्थ प्राप्त करून दिला.

लोकशाहीचे सार्वजनिक धोरण

लोकशाही संकल्पनेचा मुख्य आशय सार्वजनिक धोरणांमध्ये असतो. शाहू महाराजांनी कृषी औद्योगिक आणि सामाजिक आशा धोरणांचा कौशल्याने वापर करून कल्याणकारी लोकशाहीची संकल्पना विकसित केली. महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या नंतर आयडिया ऑफ इंडियाच्या संकल्पनेतील कृषी क्षेत्राचे मूलभूत घटक शाहू महाराजांच्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टपणे दिसतात. शाहू महाराज हे शिवरायांचे राजकीय वारसदार. त्यामुळे शाहू महाराजांचे शिवरायांच्या बद्दलचे आकलन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबद्दलची काही महत्त्वाची उदाहरणे चित्तवेधक आहेत.

त्यात शाहू महाराजांनी कृषीसाठी पाणीपुरवठ्याचे धोरण निश्चित केले होते. त्यांनी त्यासाठी धरणाच्या बांधकामाचे काम सुरू केले होते. कृषीवर आधारित कृषी औद्योगिक प्रकल्प सुरू केले होते. कृषी औद्योगिक समाजाची संकल्पना त्यांच्या विचारात होती. राज्यसंस्थेचा पाठिंबा कृषी क्षेत्राला त्यांनी दिला होता. आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केला.

सामाजिक न्याय

शाहू महाराजांनी लोकशाही पद्धतीने सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीतून उतरविला, याची महत्त्वाची उदाहरणे पुढील आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे धोरण राबविले. महिलांसाठी शिक्षणाचा प्रकल्प सामाजिक न्याय म्हणून राबवला. वेगवेगळ्या समाजासाठी वसतिगृहे स्थापन केली. त्यांच्या लोकशाही आणि सामाजिक न्याय संकल्पनेत सामाजिक सलोखा मध्यवर्ती होता. धार्मिक सलोख्याचा पुरस्कार केला होता. शाहू महाराज हे लोकशाहीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. याबरोबरच त्यांनी लोकशाही आणि भाषिक एकोपा यांचा विचार लोकशाही म्हणून विकसित केला होता. यामुळे कारवार धारवाड निपाणी बेळगाव आणि कोल्हापूर यांच्यामध्ये भाषिक सलोखा होता.

कल्याणकारी राज्य

शाहू महाराजांनी लोकशाही आणि कल्याणकारी राज्य यांचा एकत्रित मेळ घातला होता. त्यांनी कल्याणकारी राज्याचा मात्र पूर्ण ताकदीने पुरस्कार केला होता. लोकशाही आणि वैचारिक घडामोडी यांचा एकत्रित मेळ घातला. वैचारिक मतभिन्नतेला पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. वैचारिक मतभिन्नता हे लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. या गोष्टीची भारतीय परंपरा आणि संघर्षशील लोकशाहीची संकल्पना विकसित केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीdemocracyलोकशाही