शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:34 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता.

-प्रा. डॉ. प्रकाश पवार, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता. हा विचार महाराष्ट्रामध्ये खूप खोलवर रुजलेला आहे. हा विचार भारताच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. प्रातिनिधिक लोकशाही, लोकशाहीतील सामाजिक न्याय, लोकशाहीतील सार्वजनिक धोरण आणि कल्याणकारी राज्य अशी उदाहरणे त्यांच्या लोकशाही संकल्पनेबद्दलची आहेत.

प्रतिनिधित्वाची संकल्पना

शाहू महाराजांना प्रतिनिधित्वाची संकल्पना मान्य होती. त्यांनी त्यांच्या राज्यसंस्थेत आणि राज्य कारभारात जवळपास सर्वच समाजाला प्रतिनिधित्व मिळेल, अशी काळजी घेतली होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य केले होते. या गोष्टीचे प्रतीक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव परिषद आहे. राज्य कारभार, प्रशासनामध्ये समतोल नेतृत्व आणि सर्वच समाजांमधील नेतृत्वाला त्यांनी सामावून घेतले होते. त्यांनी लोकशाहीला समावेशन हा नवीन अर्थ प्राप्त करून दिला.

लोकशाहीचे सार्वजनिक धोरण

लोकशाही संकल्पनेचा मुख्य आशय सार्वजनिक धोरणांमध्ये असतो. शाहू महाराजांनी कृषी औद्योगिक आणि सामाजिक आशा धोरणांचा कौशल्याने वापर करून कल्याणकारी लोकशाहीची संकल्पना विकसित केली. महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या नंतर आयडिया ऑफ इंडियाच्या संकल्पनेतील कृषी क्षेत्राचे मूलभूत घटक शाहू महाराजांच्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टपणे दिसतात. शाहू महाराज हे शिवरायांचे राजकीय वारसदार. त्यामुळे शाहू महाराजांचे शिवरायांच्या बद्दलचे आकलन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबद्दलची काही महत्त्वाची उदाहरणे चित्तवेधक आहेत.

त्यात शाहू महाराजांनी कृषीसाठी पाणीपुरवठ्याचे धोरण निश्चित केले होते. त्यांनी त्यासाठी धरणाच्या बांधकामाचे काम सुरू केले होते. कृषीवर आधारित कृषी औद्योगिक प्रकल्प सुरू केले होते. कृषी औद्योगिक समाजाची संकल्पना त्यांच्या विचारात होती. राज्यसंस्थेचा पाठिंबा कृषी क्षेत्राला त्यांनी दिला होता. आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केला.

सामाजिक न्याय

शाहू महाराजांनी लोकशाही पद्धतीने सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीतून उतरविला, याची महत्त्वाची उदाहरणे पुढील आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे धोरण राबविले. महिलांसाठी शिक्षणाचा प्रकल्प सामाजिक न्याय म्हणून राबवला. वेगवेगळ्या समाजासाठी वसतिगृहे स्थापन केली. त्यांच्या लोकशाही आणि सामाजिक न्याय संकल्पनेत सामाजिक सलोखा मध्यवर्ती होता. धार्मिक सलोख्याचा पुरस्कार केला होता. शाहू महाराज हे लोकशाहीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. याबरोबरच त्यांनी लोकशाही आणि भाषिक एकोपा यांचा विचार लोकशाही म्हणून विकसित केला होता. यामुळे कारवार धारवाड निपाणी बेळगाव आणि कोल्हापूर यांच्यामध्ये भाषिक सलोखा होता.

कल्याणकारी राज्य

शाहू महाराजांनी लोकशाही आणि कल्याणकारी राज्य यांचा एकत्रित मेळ घातला होता. त्यांनी कल्याणकारी राज्याचा मात्र पूर्ण ताकदीने पुरस्कार केला होता. लोकशाही आणि वैचारिक घडामोडी यांचा एकत्रित मेळ घातला. वैचारिक मतभिन्नतेला पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. वैचारिक मतभिन्नता हे लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. या गोष्टीची भारतीय परंपरा आणि संघर्षशील लोकशाहीची संकल्पना विकसित केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीdemocracyलोकशाही