शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:57 IST

मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत निवडणूक यंत्रणेने पोटनियमानुसारच अर्ज अपात्र ठरवले, मात्र विरोधकांनी यंत्रणेवरच आक्षेप घेतला. त्यातून ते मग्रुरीची भाषा वापरत असून ‘राजाराम’चे सभासद अशी भाषा सहन करणार नाहीत, मैदान अद्याप संपलेले नाही, ही तर सुरुवात आहे, असा इशारा माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकातून दिला. कारखान्याच्या १८९९ सभासदांना अपात्र ठरवताना तुमची ही भावना कोठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहेत.कारखान्याच्या पोटनियमानुसार २९ लोकांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर विरोधकांचा जळफळाट होत आहे, मात्र १८९९ सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांची ही आपुलकीची भावना जागी झाली नाही. मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद आहे. एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला?

विरोधी आघाडीतील हे २९ वगळता इतर उमेदवारांना घेऊन त्यांनी सक्षम पॅनल बनवावं, आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत. अर्ज अपात्र ठरवले म्हणून रागाने धमक्या व मग्रुरीची भाषा वापरत आहेत, मात्र हे सहन करायला हा काय डी. वाय. पाटील कारखाना नाही.मानेंनी रडत बसण्यापेक्षा खबरदारी का घेतली नाहीसर्जेराव माने यांनी ‘राजाराम’चे अध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांनी अनेक वेळा पोटनियमांचा अभ्यास केला आहे. अर्ज अपात्र ठरल्यानंतर रडत बसण्यापेक्षा अगोदरच खबरदारी का घेतली नाही? असा सवालही महाडिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील