शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:57 IST

मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत निवडणूक यंत्रणेने पोटनियमानुसारच अर्ज अपात्र ठरवले, मात्र विरोधकांनी यंत्रणेवरच आक्षेप घेतला. त्यातून ते मग्रुरीची भाषा वापरत असून ‘राजाराम’चे सभासद अशी भाषा सहन करणार नाहीत, मैदान अद्याप संपलेले नाही, ही तर सुरुवात आहे, असा इशारा माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकातून दिला. कारखान्याच्या १८९९ सभासदांना अपात्र ठरवताना तुमची ही भावना कोठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहेत.कारखान्याच्या पोटनियमानुसार २९ लोकांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर विरोधकांचा जळफळाट होत आहे, मात्र १८९९ सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांची ही आपुलकीची भावना जागी झाली नाही. मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद आहे. एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला?

विरोधी आघाडीतील हे २९ वगळता इतर उमेदवारांना घेऊन त्यांनी सक्षम पॅनल बनवावं, आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत. अर्ज अपात्र ठरवले म्हणून रागाने धमक्या व मग्रुरीची भाषा वापरत आहेत, मात्र हे सहन करायला हा काय डी. वाय. पाटील कारखाना नाही.मानेंनी रडत बसण्यापेक्षा खबरदारी का घेतली नाहीसर्जेराव माने यांनी ‘राजाराम’चे अध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांनी अनेक वेळा पोटनियमांचा अभ्यास केला आहे. अर्ज अपात्र ठरल्यानंतर रडत बसण्यापेक्षा अगोदरच खबरदारी का घेतली नाही? असा सवालही महाडिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील