शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पावसामुळे बाजारपेठेत कडधान्ये तेजीत, नुकसानीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:18 IST

ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफरचंद, सीताफळ, डाळींब, मोसंबी, पेरूंची रेलचेल दिसत आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे बाजारपेठेत कडधान्ये तेजीत, नुकसानीचा परिणामभाजीपाल्याचा दरदाम स्थिर : फळांची रेलचेल वाढली

कोल्हापूर : ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफरचंद, सीताफळ, डाळींब, मोसंबी, पेरूंची रेलचेल दिसत आहे.यंदा खरिपाची पिके चांगली होती, त्यामुळे उत्पादन चांगले होईल, परिणामी कडधान्यांचे दर स्थिर राहतील, असा अंदाज होता. मात्र, विदर्भात महापुराने मोठे नुकसान केले. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्याचा थेट परिणाम कडधान्य बाजापेठेवर दिसत आहे.

उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच डाळीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १०० ते १०५ रुपये, हरभराडाळ ७० ते ७२ रुपये किलो आहे. सरकी तेलाने यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे. मूग १०० रुपये, मूगडाळ १२० तर मसूर डाळ १०० रूपये किलो राहिली आहे. ज्वारी प्रतीनुसार ३० ते ६० रुपये किलो तर शाबू ७० रुपये किलो आहे.पावसामुळे भाजीपाल्यालाही फटका बसला असला तरी मागणी आणि आवक यांत फारसा फरक नसल्याने दरदामामध्ये चढउतार दिसत नाही. कोबी वगळता गेल्या आठवड्याच्या तुलनेत इतर भाज्यांचे दर काहीसे स्थिर राहिले आहेत.

कोथंबिरीचीची आवक थोडी कमी झाली असली तरी दरात फार फरक पडलेला नाही. मेथी, पालक, पोकळा, शेपूची आवकही मर्यादित असल्याने दर कायम आहेत.गणेशोत्सवानंतर फळबाजार काहीसा शांत झाला होता. मात्र या आठवड्यात सफरचंद, मोसंबी, चिक्कू, पेरू, डाळींब, सीताफळांची रेलचेल सुरू आहे. सफरचंद १०० ते १६० रुपये किलोपर्यंत आहे. सीताफळांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.

बाजार समितीत २०० ते ६०० ढीग (१२ ते १५ नग) असा सीताफळांचा दर राहिला आहे. यंदा दसरा महिनाभर लांबणीवर गेल्याने सप्टेंबरमध्ये फळांना असणारी तेजी यंदा दिसत नाही.ओला वाटाणा ६० रुपयांवरओला वाटाणा घाऊक बाजारात ११० रुपये तर किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आता आवक थोडी वाढू लागली आहे, रविवारी कोल्हापुरात २० पोत्यांची आवक झाल्याने दर ६० रुपये किलोपर्यंत आला होता.कांदा-बटाटा स्थिरकांदा, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी १०, तर बटाटा २५ रुपये किलो आहे. 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर