शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

पावसामुळे बाजारपेठेत कडधान्ये तेजीत, नुकसानीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:18 IST

ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफरचंद, सीताफळ, डाळींब, मोसंबी, पेरूंची रेलचेल दिसत आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे बाजारपेठेत कडधान्ये तेजीत, नुकसानीचा परिणामभाजीपाल्याचा दरदाम स्थिर : फळांची रेलचेल वाढली

कोल्हापूर : ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफरचंद, सीताफळ, डाळींब, मोसंबी, पेरूंची रेलचेल दिसत आहे.यंदा खरिपाची पिके चांगली होती, त्यामुळे उत्पादन चांगले होईल, परिणामी कडधान्यांचे दर स्थिर राहतील, असा अंदाज होता. मात्र, विदर्भात महापुराने मोठे नुकसान केले. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्याचा थेट परिणाम कडधान्य बाजापेठेवर दिसत आहे.

उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच डाळीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १०० ते १०५ रुपये, हरभराडाळ ७० ते ७२ रुपये किलो आहे. सरकी तेलाने यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे. मूग १०० रुपये, मूगडाळ १२० तर मसूर डाळ १०० रूपये किलो राहिली आहे. ज्वारी प्रतीनुसार ३० ते ६० रुपये किलो तर शाबू ७० रुपये किलो आहे.पावसामुळे भाजीपाल्यालाही फटका बसला असला तरी मागणी आणि आवक यांत फारसा फरक नसल्याने दरदामामध्ये चढउतार दिसत नाही. कोबी वगळता गेल्या आठवड्याच्या तुलनेत इतर भाज्यांचे दर काहीसे स्थिर राहिले आहेत.

कोथंबिरीचीची आवक थोडी कमी झाली असली तरी दरात फार फरक पडलेला नाही. मेथी, पालक, पोकळा, शेपूची आवकही मर्यादित असल्याने दर कायम आहेत.गणेशोत्सवानंतर फळबाजार काहीसा शांत झाला होता. मात्र या आठवड्यात सफरचंद, मोसंबी, चिक्कू, पेरू, डाळींब, सीताफळांची रेलचेल सुरू आहे. सफरचंद १०० ते १६० रुपये किलोपर्यंत आहे. सीताफळांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.

बाजार समितीत २०० ते ६०० ढीग (१२ ते १५ नग) असा सीताफळांचा दर राहिला आहे. यंदा दसरा महिनाभर लांबणीवर गेल्याने सप्टेंबरमध्ये फळांना असणारी तेजी यंदा दिसत नाही.ओला वाटाणा ६० रुपयांवरओला वाटाणा घाऊक बाजारात ११० रुपये तर किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आता आवक थोडी वाढू लागली आहे, रविवारी कोल्हापुरात २० पोत्यांची आवक झाल्याने दर ६० रुपये किलोपर्यंत आला होता.कांदा-बटाटा स्थिरकांदा, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी १०, तर बटाटा २५ रुपये किलो आहे. 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर