शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद संभाजीराजेंकडेच राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:25 PM

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या ‘रायगड विकास प्राधिकरण’चे अध्यक्षपद सत्तांतरानंतरही खासदार संभाजीराजे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये गतवेळी भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी पक्षात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. याच दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे यांची राज्यभर असलेली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदारपदी नियुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घालून त्यांचा सन्मान केला.याही पुढे जात त्यांनी संभाजीराजे यांच्या रायगड विकासासाठीच्या प्रयत्नांना मूर्त रूप देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपदही संभाजीराजे यांच्याकडे दिले. आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपयांची कामे या ठिकाणी झाली आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

खासदार संभाजीराजे हे शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील पुरातत्त्व विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून रायगड विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी शुक्रवारी या दोघांचीही मुंबईत भेट घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे. 

नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच निर्णय घेताना आम्ही रायगड विकास प्राधिकरणाचा जो विकासकामांचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, तोच प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. यावरून त्यांचे किल्ल्यांवरील प्रेम दिसून येते. विविध विभागांचे अनेक प्रस्ताव असताना त्यांनी किल्ले रायगडच्या विकास प्रस्तावाला प्राधान्य दिले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.खासदार संभाजीराजे  .अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर