शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:09 IST

उल्हास पाटील, संजय घाटगे यांचाही भाजप प्रवेश निश्चित  

कोल्हापूर : ‘राधानगरी’चे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील हे लवकरच स्वगृही परतणार आहेत. उद्धवसेनेचे माजी आमदार व विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या छावणीत गेलेले उल्हास पाटील यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून हा पक्षाला मोठा झटका मानला जात आहे.के. पी. पाटील व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना अनेक वर्षांचा आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या पडत्या काळात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे त्यांच्या मागे उभे राहिले. के. पी. पाटील हे एकदा अपक्ष तर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ‘राधानगरी’ मतदारसंघ शिंदेसेनेला गेल्याने त्यांची कोंडी झाली होती. ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास तयार होते, पण महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला गेल्याने अखेरच्या क्षणी त्यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यांच्या रूपाने सहकारातील तगडा नेता पक्षासोबत आल्याने पक्षाची ग्रामीण भागातील मुळे घट्ट होतील, अशी अपेक्षा पक्षनेतृत्वासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना होती.

पण, विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पहिल्यांदा राधानगरी व भुदरगड तालुक्यातील त्यांचे शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना पाठवण्यास सुरुवात केली. रविवारच्या पक्षनोंदणी प्रारंभासाठी पाटील यांचे सुपुत्र, ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी उपस्थिती लावत शिवबंधनांची गाठ तोडून पुन्हा हातात घड्याळ बांधले.शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे, उल्हास पाटील हे राहिले. पण, विधानसभा निवडणुकीत डॉ. मिणचेकर व पाटील यांनी स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवली. यामध्ये दोघांनाही अपयश आले. डॉ. मिणचेकर यांनी शिंदेसेनेचा मार्ग धरला, पण उल्हास पाटील यांची अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे गोची झाल्याने त्यांनी भाजपचा मार्ग धरला आहे.

‘उद्धवसेने’च्या अस्तित्वासमोर प्रश्नएकसंध शिवसेनेचे दोन खासदार, सहा आमदार, दहा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्याशिवाय एकही ताकदवान नेता उद्धवसेनेत न राहिल्याने अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘ए. वाय.’ यांचे वेट ॲन्ड वॉचवैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘चिमण्यांनो परत फिरा’ अशी हाक दिली असून बहुतांशी परतीच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदेचे दोन आकडी सदस्य संख्या करायची झाल्यास मातब्बरांना पक्षात घेणे गरजेचे आहे, हे ओळखूनच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचीही मनधरणी सुरू आहे. पण, सध्या त्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस