शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:09 IST

उल्हास पाटील, संजय घाटगे यांचाही भाजप प्रवेश निश्चित  

कोल्हापूर : ‘राधानगरी’चे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील हे लवकरच स्वगृही परतणार आहेत. उद्धवसेनेचे माजी आमदार व विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या छावणीत गेलेले उल्हास पाटील यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून हा पक्षाला मोठा झटका मानला जात आहे.के. पी. पाटील व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना अनेक वर्षांचा आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या पडत्या काळात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे त्यांच्या मागे उभे राहिले. के. पी. पाटील हे एकदा अपक्ष तर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ‘राधानगरी’ मतदारसंघ शिंदेसेनेला गेल्याने त्यांची कोंडी झाली होती. ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास तयार होते, पण महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला गेल्याने अखेरच्या क्षणी त्यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यांच्या रूपाने सहकारातील तगडा नेता पक्षासोबत आल्याने पक्षाची ग्रामीण भागातील मुळे घट्ट होतील, अशी अपेक्षा पक्षनेतृत्वासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना होती.

पण, विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पहिल्यांदा राधानगरी व भुदरगड तालुक्यातील त्यांचे शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना पाठवण्यास सुरुवात केली. रविवारच्या पक्षनोंदणी प्रारंभासाठी पाटील यांचे सुपुत्र, ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी उपस्थिती लावत शिवबंधनांची गाठ तोडून पुन्हा हातात घड्याळ बांधले.शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे, उल्हास पाटील हे राहिले. पण, विधानसभा निवडणुकीत डॉ. मिणचेकर व पाटील यांनी स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवली. यामध्ये दोघांनाही अपयश आले. डॉ. मिणचेकर यांनी शिंदेसेनेचा मार्ग धरला, पण उल्हास पाटील यांची अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे गोची झाल्याने त्यांनी भाजपचा मार्ग धरला आहे.

‘उद्धवसेने’च्या अस्तित्वासमोर प्रश्नएकसंध शिवसेनेचे दोन खासदार, सहा आमदार, दहा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्याशिवाय एकही ताकदवान नेता उद्धवसेनेत न राहिल्याने अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘ए. वाय.’ यांचे वेट ॲन्ड वॉचवैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘चिमण्यांनो परत फिरा’ अशी हाक दिली असून बहुतांशी परतीच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदेचे दोन आकडी सदस्य संख्या करायची झाल्यास मातब्बरांना पक्षात घेणे गरजेचे आहे, हे ओळखूनच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचीही मनधरणी सुरू आहे. पण, सध्या त्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस