शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; राधानगरी धरणात ६१, तर ‘काळम्मावाडी’त ५१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:49 IST

गौरव सांगावकर राधानगरी : धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. ...

गौरव सांगावकरराधानगरी : धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांमुळेकोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. महाराष्ट्रातील अतिशय भक्कम जलाशय म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते.राधानगरी धरणात सध्या ६१.०३ टक्के म्हणजे १३४.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात १३६.४६ दलघमी (४.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. यंदाही जवळपास ४.७४ टीएमसी साठा आहे. उन्हाळ्यामध्ये सलग पंधरा दिवस राधानगरी धरणातून ८०० ते १००० क्युसेक पाणी भोगावती नदी पात्रात सोडले जाते. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून, शेतीसह पिण्याचे पाणीसुद्धा याच धरणातून वापरले जाते. आता कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून पाणी पोहोचणार आहे. तालुक्यातील असणारे तुळसी जलाशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते. यामुळे धामोड नदीकाठाची गावे आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आहेत. तालुक्यातील धरणांमुळे आजवर पाणीबाणी जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो.सध्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणात ५१.८३ टक्के तर तुळसी जलाशयात ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक असणारा पाणीसाठा तीन महिने जपून वापरावा लागणार आहे. अलीकडे वाढत असलेल्या तापमानामुळे राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तरीही तीन महिने कडक उन्हाचे असल्याने पाणी जपून वापरावे लागेल. सध्या उपसाबंदी केली जात नाही, त्यामुळे शेतीला पाणीटंचाई भासणार नाही. -प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे राधानगरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी