शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात; कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के पेरण्या; 'या' तालुक्यात पेरा घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 12:08 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. शाहूवाडी तालुक्यातील केवळ ६४ टक्केच पेरण्या झाल्या असून, कागल ९२ टक्के तर हातकणंगले व भुदरगड तालुक्यात ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी पेर क्षेत्र वाढले असले, तरी अद्याप ९६ टक्केच पेरणी झालेली आहे.यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील ऑक्टोबर महिना वाया गेला. खरिपाची काढणी लांबल्याने, रब्बीचा हंगामही पुढे गेला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. साधारणत: डिसेंबरअखेर रब्बीच्या पेरण्या होतात. आतापर्यंत २१ हजार २५९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण कमी आहे. तालुकानिहाय सरासरी क्षेत्र पाहिले, तर शाहूवाडी, कागल, भुदरगड व हातकणंगले तालुक्यात पेरण्या कमी झाल्या.सूर्यफुलाची केवळ १२ हेक्टरवरच पेरणीएकीकडे गोडेतेलाच्या दरात वाढ होत असताना, सूर्यफुलाची लागवड कमी होत चालली आहे. सूर्यफुलाचे जिल्ह्यात १५७ हेक्टर क्षेत्र असताना, केवळ १२ हेक्टरवर फक्त शाहूवाडी तालुक्यात पेरणी झालेली आहे.

तालुकानिहाय रब्बीच्या पेरण्या, हेक्टरमध्ये तालुका             पेरणी            टक्केवारीशिरोळ             ८६१               १२४पन्हाळा            २,२५८           १०५राधानगरी         ४८५              १०६चंदगड             २५६              ११४गगनबावडा      २६१               १०८करवीर            १,८२५            १०२गडहिंग्लज       ४,७६०           १०१आजरा             १,३८१            १४१भुदरगड          २१२                ९४हातकणंगले     ५,७७५           ९४कागल             २,९७८            ९२शाहूवाडी         १,४८८            ६४

पीकनिहाय अशी झाली पेरणी, हेक्टरमध्येपीक           सर्वसाधारण क्षेत्र            प्रत्यक्ष पेरणीज्वारी         ११ हजार ७९३             ११ हजार ९३६गहू             १ हजार ७५६              १ हजार ४६९मका           २ हजार २२०              १ हजार ८८३हरभरा       ४ हजार ७४६              ४ हजार ७२३सूर्यफूल      १५७                           १२

टॅग्स :kolhapurकोल्हापूर