शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हिंसेला पाऊस, धुक्याचे कारण; अटकेसाठी काय ?; विशाळगड घटनेबद्दल पोलिसांच्या खुलाशावर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:57 IST

संशयितांच्या अटकेची मागणी

कोल्हापूर : विशाळगड येथे १४ जुलैला जोरदार पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा करणाऱ्या हल्लेखोरांना रोखू शकलो नाही, असा खुलासा पोलिसांनी सोमवारी (दि. २९) मुंबई उच्च न्यायालयात केला. मात्र, त्यानंतर १५ दिवस उलटले तरी हिंसा घडवणाऱ्या प्रमुखांना अटक का केली जात नाही? अटक न करण्यासाठी काय कारणे आहेत? असा सवाल हिंसाग्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे.विशाळगड येथील अतिक्रमणे आणि १४ जुलैला झालेल्या हिंसेबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी पोलिसांची बाजू मांडली. १४ जुलैला विशाळगड येथे प्रचंड पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा रोखू शकलो नाही, असा खुलासा घेरडे यांनी केला. तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांची माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.हिंसा रोखण्यात आलेल्या अपयशाचे खापर पोलिसांकडून पाऊस आणि धुके यावर फोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटना घडून १५ दिवस उलटले तरी हिंसेला कारणीभूत असलेल्या प्रमुख संशयितांना अटक का होऊ शकली नाही? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.गुन्हा ५०० जणांवर, अटक केवळ २४पोलिसांनी दाखल केलेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सुमारे ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील केवळ २४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात एकाही म्होरक्याचा समावेश नाही. रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे हे दोघेही अजून पसार आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा गुन्हा आहे. पण, तोही पोलिसांनी लपवल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बंदोबस्ताचे नियोजन चुकले?विशाळगडाच्या पायथ्याला किती आंदोलक येतील याचा अंदाज घेण्यात पोलिस अपयशी ठरले. परिणामी, ते पुरेसा बंदोबस्त तैनात करू शकले नाहीत. बंदोबस्ताचे नियोजन करण्यात उणिवा राहिल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस