शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

Kolhapur: हिंसेला पाऊस, धुक्याचे कारण; अटकेसाठी काय ?; विशाळगड घटनेबद्दल पोलिसांच्या खुलाशावर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:57 IST

संशयितांच्या अटकेची मागणी

कोल्हापूर : विशाळगड येथे १४ जुलैला जोरदार पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा करणाऱ्या हल्लेखोरांना रोखू शकलो नाही, असा खुलासा पोलिसांनी सोमवारी (दि. २९) मुंबई उच्च न्यायालयात केला. मात्र, त्यानंतर १५ दिवस उलटले तरी हिंसा घडवणाऱ्या प्रमुखांना अटक का केली जात नाही? अटक न करण्यासाठी काय कारणे आहेत? असा सवाल हिंसाग्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे.विशाळगड येथील अतिक्रमणे आणि १४ जुलैला झालेल्या हिंसेबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी पोलिसांची बाजू मांडली. १४ जुलैला विशाळगड येथे प्रचंड पाऊस आणि धुके असल्यामुळे हिंसा रोखू शकलो नाही, असा खुलासा घेरडे यांनी केला. तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांची माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.हिंसा रोखण्यात आलेल्या अपयशाचे खापर पोलिसांकडून पाऊस आणि धुके यावर फोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटना घडून १५ दिवस उलटले तरी हिंसेला कारणीभूत असलेल्या प्रमुख संशयितांना अटक का होऊ शकली नाही? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.गुन्हा ५०० जणांवर, अटक केवळ २४पोलिसांनी दाखल केलेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सुमारे ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील केवळ २४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात एकाही म्होरक्याचा समावेश नाही. रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे हे दोघेही अजून पसार आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा गुन्हा आहे. पण, तोही पोलिसांनी लपवल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बंदोबस्ताचे नियोजन चुकले?विशाळगडाच्या पायथ्याला किती आंदोलक येतील याचा अंदाज घेण्यात पोलिस अपयशी ठरले. परिणामी, ते पुरेसा बंदोबस्त तैनात करू शकले नाहीत. बंदोबस्ताचे नियोजन करण्यात उणिवा राहिल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस