शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर कॉटन मिल कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

एकवीस वर्षांपूूर्वी मिल बंद : थकित देणी मिळवून देण्यासाठी जागृत कामगार पुनर्वसन समितीची स्थापना

गजानन साळुंखे - माधवनगर -एकेकाळी कापड उद्योगासाठी संपूर्ण राज्यात नावलौकिक असणाऱ्या व सध्या ओसाड माळरान बनलेल्या माधवनगर येथील दि कॉटन मिल कामगारांच्या हक्कासाठी २१ वर्षांनी पुन्हा काही मूठभर कामगारांनी रणशिंग फुंकले आहे. दि माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली असून, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. दि माधवनगर कॉटन मिल २९ सप्टेंबर १९९४ मध्ये विविध कारणांनी बंद पडली. मिल पुन्हा सुरू करण्याच्या आणाभाका घेत असंख्य राजकीय घोषणा झाल्या. अनेक आंदोलने झाली; पण राजकीय साठमारीत या मिलचा भोंगा काही पुन्हा वाजला नाही. मिलच्या बॉयलरबरोबरच कामगारांच्या चुलीही बंद पडल्या. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्यावर या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही बिकट परिस्थितीशी झुंजावे लागले. मिल बंद पडल्याने एक पिढी उद्ध्वस्त झाली. मिल बंद पडताना मिलमध्ये प्रत्यक्ष दोन हजार, तर कंत्राटी पद्धतीने पाचशेहून अधिक कामगार काम करत होते. याबरोबरच मिलवर अवलंबून विविध उद्योगधंदे होते. ही मिल सुरू व्हावी अथवा कामगारांची देणी मिळावीत, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृृत्वाखाली २००१ मध्ये जनआंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन रस्त्यावर सुरू होतेच, त्याचबरोबर न्यायालयीन पातळीवरही लढाई सुरू होती. या आंदोलनाच्या रेट्यामुळे कॉटन मिलच्या लिक्विडेशन प्रक्रियेला वेग आला आणि माधवनगर कॉटन मिलचा लिलाव झाला. यामुळे मिलवर असणाऱ्या काही बॅँकांची कर्जे, काही कामगारांची काहीप्रमाणात देणी मिळाली. काही प्रमाणात न्याय मिळाला, पण कामगारांचा प्रश्न पूर्णत: सुटला नाही. आजही अनेक कामगारांचे हक्काचे पैसे काही प्रमाणात येणे बाकी आहे. मिलच्या अनेक कामगारांचे निधन झाले आहे. त्यांचे वारस आजही वाट पहात आहेत. कामगारांची ग्रॅच्युईटीची २३ टक्के रक्कम काही कामगारांना मिळाली आहे, तर काही कामगारांना काहीच रक्कम मिळाली नाही.मिलच्या लिलावानंतर किती बॅँकांची कर्जे भागवण्यात आली? किती कामगारांना पैसे मिळाले? कामगारांच्या चाळीच्या जागेचे काय झाले? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची माहिती कामगार, ग्रामस्थांना मिळत नाही. दि माधवनगर कॉटन मिलची सर्व प्रक्रिया मुुंबई येथील लिक्विडेटर कार्यालयातून चालते. तेथे सामान्य कामगार पोहोचू शकत नाही. यासाठी काही कामगारांनी पुढाकार घेतला असून, ‘दि. माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समिती’च्या माध्यमातून जनआंदोलन उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी एक-दोन बैठकाही झाल्या असून, मार्गदर्शक म्हणून एसटी कामगार नेते बिराज साळुंखे, भारत सूतगिरणीचे सलभद्र पाटील, माजी उपसरपंच गोविंद परांजपे, दीपक कांबळे, निमंत्रक म्हणून शिवाजीराव पाटील, संभाजी यादव, उत्तम कांबळे, मोहन माने, भगवान दाजी पाटील ही कामगार मंडळी धडपडत आहेत. नव्या पुनर्वसन समितीमार्फत लिक्विडेटर न्यायालयात कामगारांसाठी दाद मागितली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा २१ वर्षांनी मिलप्रश्नी आंदोलन सुरू होणार, हे नक्की !समितीकडे २५७ कामगारांची यादीकॉटन मिलचा काही वर्षापूर्वी लिलाव झाला. त्यातून बॅँकांची देणी, काही प्रमाणात कामगारांची देणी भागविण्यात आली. मात्र अनेकांना पैसे मिळालेले नाहीत. सध्या माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समितीकडे २५७ कामगारांची यादी प्राप्त झाली असून, या कामगारांची थकबाकी, पैसे मिलकडून येणे आहेत. पण यादीव्यतिरिक्त असंख्य कामगार सध्या सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पसरले आहेत. ज्यांना अजून मिलकडून पैसे मिळाले नाहीत किंवा अपूर्ण रक्कम मिळाली आहे, अशा कामगारांचा शोध घेणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे या समितीपुढील मोठे लक्ष आहे.