शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 :पुणेकर मला परका समजणार नाहीत : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:37 IST

पुणे शहर, कोथरुडमधील गल्ल्यागल्यांमध्ये वर्षानुवर्षे माझी ओळख असणारे, ज्यांच्या घरी अनेकवेळा गेलो आहे, असे अनेक मंडळी आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देMaharashtra Vidhan Sabha 2019 : पुणेकर मला परका समजणार नाहीत : चंद्रकांत पाटीलयुतीत थोडा न्याय-अन्याय चालतो

कोल्हापूर : एकतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे.

आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकरांना मी काय परका नाही. पुणे शहर, कोथरुडमधील गल्ल्यागल्यांमध्ये वर्षानुवर्षे माझी ओळख असणारे, ज्यांच्या घरी अनेकवेळा गेलो आहे, असे अनेक मंडळी आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.आमदार अमल महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, काही भविष्यातील गणिते केंद्रीय नेतृत्वाच्या मनात असतील, त्यामुळे त्यांनी मला कोथरुडमधून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला.

कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला येथे भाजपला १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. कोणी बंडखोरी करणार नाहीत. जीवंत माणसे असल्याने ती नाराज होणार, रागविणार, बंडखोरीचा अर्ज भरणार पण, ते सर्वजण माघार घेणार. ही निवडणूक महायुती ताकदीने लढणार आहे.

पक्षाचा राज्यअध्यक्ष झाल्यापासून राज्याच्या समन्वयामुळे कोल्हापूरला येणे कमी झाले. पण, माझा मूळ जिल्हा कोल्हापूर असल्याने याठिकाणी आग्रहाने मला लक्ष द्यावे लागणार आहे. या जिल्ह्याचा कार्यकर्ता असल्याने अमल महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी आलो आहे. त्यांचा संपर्क आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर ते गेल्या निवडणुकीपेक्षा जादा मतांनी विजयी होतील. त्यांना देश आणि महाराष्ट्रात सरकारने केलेल्या कामाचा फायदा होईल. कोण, काय ठरवतयं याच्याशी आमचा संबंध नाही.

आमची ताकद आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता इतकी मोठी आहे की, कशाचा परिणाम होणार नाही. विजय ही विजय आहे. अनेकांना असे वाटले की कोल्हापूरमध्ये दहा पैकी आठ जागा शिवसेनेला गेल्या, पण महाराष्ट्रात नागपूरसह किमान सात-आठ जिल्हे असे आहेत की, जिथे शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यात शिवसेनेला देखील वाईट वाटत नाही, कारण युतीमध्ये असा थोडा न्याय-अन्याय चालतो.

कोल्हापूर जिल्ह्यात जर,सहा विद्यमान आमदार असतील, दोन ज्या नव्हत्या, त्याठिकाणी त्यांनी चांगली लढत दिली असेल, तर मला अवाजवी काही मागता येत नाही. त्यामुळे सेनेला आठ जागा जाणे स्वभाविक होते. जवळच्या सातारा जिल्ह्यात आठ पैकी पाच, सांगलीमध्ये आठ पैकी चार, पुणे येथील आठ पैकी आठ जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिवसेना आणि आम्ही अनावश्यक आग्रह धरला नाही. तसा आमचा स्वभाव नाही. त्यामुळे मला असे वाटते कोल्हापूरमध्ये केवळ दोन जागा आम्हाला मिळाल्या अशी चर्चा करणे योग्य नाही.

कागलसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलाकागलची जागा भाजपला मिळावी यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला. समरजितसिंह घाटगे यांनी खूप मोठी तयारी केली. मात्र, आम्ही सर्वजण चांगले कार्यकर्ते आहोत. जो निर्णय होतो तो आम्ही मान्य करतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.काटा काढण्याबाबत विचारणारआपल्या लोकशाहीमध्ये कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यावेळी मला अजित पवार भेटतील, त्यावेळी मी त्यांना काट्याने काटा काढण्याबाबत विचार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर