शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

पीक नुकसानीचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:40 IST

Rain, kolhapur, Agriculture Sector पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक या त्रिस्तरीय यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू झाले असून, आठवडाभरात अहवाल तयार होणार आहे.

ठळक मुद्देपीक नुकसानीचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत पंचनामेआठवडाभरात अहवाल : २३५० हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

कोल्हापूर : पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक या त्रिस्तरीय यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू झाले असून, आठवडाभरात अहवाल तयार होणार आहे.गेला आठवडाभर कोसळलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, भाजीपाला या पिकांचे नुकसान मोठे आहे. यातही भाताचे नुकसान सर्वाधिक आहे. या पिकांची कापणी, मळणी सुरू असतानाच ढगफुटीसारख्या आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. नुकसानीचा टक्का जास्त असल्याने शेतकरी हतबल झाला असून पंचनाम्याची मागणी होत होती.त्यानुसार कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज अहवाल तयार केला, त्यात साधारणपणे २३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे गृहीत धरून पुढील पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महसूल व कृषी यंत्रणांना पंचनाम्याची प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्यक्ष शिवारात, बांधावर जाऊन पाहणी करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले. अजूनही अधूनमधून पाऊस असल्याने फेरपंचनामेही करावे लागणार असल्याने अहवाल तयार करण्यासाठी आठवडाभराचा अवधी दिला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र