शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पीक नुकसानीचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:40 IST

Rain, kolhapur, Agriculture Sector पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक या त्रिस्तरीय यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू झाले असून, आठवडाभरात अहवाल तयार होणार आहे.

ठळक मुद्देपीक नुकसानीचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत पंचनामेआठवडाभरात अहवाल : २३५० हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

कोल्हापूर : पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक या त्रिस्तरीय यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू झाले असून, आठवडाभरात अहवाल तयार होणार आहे.गेला आठवडाभर कोसळलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, भाजीपाला या पिकांचे नुकसान मोठे आहे. यातही भाताचे नुकसान सर्वाधिक आहे. या पिकांची कापणी, मळणी सुरू असतानाच ढगफुटीसारख्या आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. नुकसानीचा टक्का जास्त असल्याने शेतकरी हतबल झाला असून पंचनाम्याची मागणी होत होती.त्यानुसार कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज अहवाल तयार केला, त्यात साधारणपणे २३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे गृहीत धरून पुढील पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महसूल व कृषी यंत्रणांना पंचनाम्याची प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्यक्ष शिवारात, बांधावर जाऊन पाहणी करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले. अजूनही अधूनमधून पाऊस असल्याने फेरपंचनामेही करावे लागणार असल्याने अहवाल तयार करण्यासाठी आठवडाभराचा अवधी दिला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र