शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

पेठ-सांगली सहापदरीकरणाच्या प्रस्तावास गती

By admin | Updated: August 16, 2016 23:32 IST

भूसंपादनावर भवितव्य : दोन तालुक्यांच्या प्रगतीला मिळेल बळ; शहरांमधील वाहतुकीचा भार कमी करण्यास उपयोग

सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पेठ-सांगली रस्त्याच्या सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे. पेठपासून थेट म्हैसाळपर्यंतच्या सहापदरी रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याने वाळवा, मिरज तालुक्याच्या प्रगतीच्यादृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. रस्त्याची लांबी मोठी असल्याने याठिकाणच्या भूसंपादनावर कामाचे भवितव्य अवलंबून आहे. सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा २५0 कोटींचा प्रस्ताव यापूर्वी पाठविण्यात आला होता. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजूस ९ मीटरचा रस्ता प्रस्तावित होता. या रस्त्याचे काम काहीअंशी पूर्ण झाले असले तरी वाढत्या वाहनांचा विचार करता, चौपदरीकरणाचा फारसा उपयोग होणार नाही, असाही सूर उमटत आहे. शंकांच्या याच गर्दीतून सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव तयार झाला. आ. सुधीर गाडगीळ यांनी पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ असा मोठा मार्ग सहापदरी करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनीही याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितल्याने या प्रस्तावाला आता गती आली आहे. तांत्रिक गोष्टींसह लवकरच हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. सहापदरीकरण करतानाच कृष्णा नदीवर दोन स्वतंत्र पुलांचा उल्लेखही करण्यात आला आहे. यापूर्वी चौपदरीकरणाला भूसंपादनाचा कोणताही अडथळा आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेतच चौपदरीकरणाचा आराखडा पूर्ण झाला होता. त्यामुळे मंजुरीच्या पातळीवर प्रस्तावाला गती मिळाली होती. सहापदरीकरण करताना या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना नुकसानभरपाईचा नवा कायदाही लागू होईल. त्यामुळे सहापदरीचा खर्च कित्येक पटीने वाढणार आहे. शासनाने खर्चाच्या मोठ्या शक्यतेलाही अनुकूलता दर्शविली, तर सहापदरीकरणाचे स्वप्न सत्यात उतरू शकते. पेठ-सांगलीपर्यंतच्या शेतजमिनीबरोबरच सांगली, मिरजेतील गावठाणातील, विस्तारित भागातील रहिवासी जमिनीही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करावी लागणार आहे. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्यामते सहापदीरकरणाचे काम मंजूर झाले, तर हा रस्ता दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्याच्याच प्रगतीसाठी लाभदायी ठरणार आहे. कृष्णा नदीवरील प्रस्तावित दोन पुलांमुळे आणि शहरातील सहापदरी रस्त्याच्या अस्तित्वामुळे वाहतुकीचा मोठा भार कमी होणार आहे. अपघातांचे प्रमाण यामुळे कमी होण्याची शक्यताही आहे. (प्रतिनिधी)रस्ता मोठा : भूसंपादनही अधिकपेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रस्ता मोठा : भूसंपादनही अधिकपेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ या ६२ किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण करावेसीआरएफ (सेंट्रल रोड फंड) मधून काम मंजूर करावेकृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला दोन पर्यायी पूल याच कामातून मंजूर व्हावेतएक पूल कोल्हापूर रस्ता ओलांडून हरिपुरजवळून नदीवर उभारावा व सांगलीवाडी, समडोळीपासून पुढे प्रस्तावित करावादुसरा पूल पांजरपोळमार्गे कृष्णा नदीवर व्हावा