शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बाल हक्क आयोगाचे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:24 PM

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षासह सहा सदस्य निवडीची प्रक्रिया राज्य शासनाने मंगळवारी सुरू केली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची मुदत संपल्याने आगामी तीन वर्षांसाठी नवे पदाधिकारी निवडले जातील.

ठळक मुद्देबाल हक्क आयोगाचे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरूअर्ज मागवले : तीन पक्षांचे सरकार असल्याने चढाओढ होणार

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षासह सहा सदस्य निवडीची प्रक्रिया राज्य शासनाने मंगळवारी सुरू केली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची मुदत संपल्याने आगामी तीन वर्षांसाठी नवे पदाधिकारी निवडले जातील.

अर्ज तर मागवले; परंतु त्यांची छाननी होऊन निवड कधी होणार याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात अध्यक्षपद कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडे द्यायचे म्हणून निवडच झाली नव्हती.हा आयोग अध्यक्षासह सात सदस्यांचा असतो. त्यामध्ये दोन महिला सदस्य असतात. शिक्षण, बालकांचे आरोग्य, बालकामगार प्रथा निर्मूलन, बाल मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकांचे कायदे या क्षेत्रांत सचोटीने काम केलेल्या व्यक्तीस या आयोगावर काम करण्याची संधी दिली जाते. अध्यक्षास राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो. शिवाय आयोगाचे सदस्य सचिव हे आयएएस दर्जाचे अधिकारी असतात. मावळते अध्यक्ष घुगे हे मूळचे औरंगाबादचे होते.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे पंकजा मुंडे महिला बालविकास मंत्री असताना त्यांना ही संधी मिळाली. आताही या पदावर कुणाला संधी मिळते याबद्दल उत्सुकता आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सदस्य प्रत्येकी दोन याप्रमाणे वाटून घेतले जातील; परंतु महिला बालविकास मंत्री काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आहेत.

अगोदरच काँग्रेस आपल्याला सत्तेत फारसे स्थान नसल्याची तक्रार करीत आहे. त्यामुळे हे अध्यक्षपदही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मिळण्याची शक्यता जास्त वाटते. आयोग बालकांच्या हक्कांचे रक्षण करणारा असला तरी त्यावरील पदे भरताना कायमच राजकीय हक्कांचा समतोलही सांभाळावा लागतो.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना दोन्ही काँग्रेसचे राज्यात सरकार होते; परंतु आयोगाचे अध्यक्षपद कुणाला द्यायचे हा वाद न मिटल्याने व वाद मिटत नाही तर फाईलच बाजूला ठेवण्याची माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना सवय असल्याने हे पदच भरले नव्हते.काय करतो आयोग

  1. बालकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास किंवा बालकांना हिंसाचारास सामोरे जावे लागल्यास त्याची सुनावणी घेऊन निर्णय देणे.
  2. बाल हक्क कायद्याबाबत जनजागृती
  3. बाल अधिनियम २०१५ च्या कलम १०९ मध्ये बालन्याय कायद्यावर देखरेख करण्याची जबाबदारी.
टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर