शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:31 IST

जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल

ठळक मुद्देस्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूकमहिलेसह तिघांना अटक :कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : आपल्या मुखातून साक्षात स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून संदीप प्रकाश नंदगांवकर (वय ३८, व्यवसाय : व्यापार, रा. ७४१/२, सुबल रेसिडेन्सी, देवकर पाणंद) या भक्तांकडून फ्लॅट, मठ व राधानगरी येथील गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल झाली.

या प्रकरणी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस (४४, रा. १७३१/३८, बी वॉर्ड, सिद्धाळ‌ा गार्डनमागील परिसर, मंगळवार पेठ), श्रीधर नारायण सहस्रबुद्धे (५५, रा. प्लॉट नं. ६१, सासने बिल्डिंग, चौथा बसस्टॉप, फुलेवाडी), सविता अनिल अष्टेकर (३५, रा. मंगळवार पेठ) या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. या तिघांविरुद्ध आतापर्यंत १२ लोकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत.

किमान तीन कोटी ८६ लाख ६६ हजार ९९० रुपये रोख व कर्ज काढून आणि नऊ लाख ६७ हजारांचे सोन्याचे दागिने अशी एकत्रित तीन कोटी ९६ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. श्रीधर सहस्रबु्द्धे हा फडणीस याचा गुरू आहे व सविता अष्टेकर ही महिला मठातील सेवेकरी आहे. ती पतीपासून विभक्त राहून हे काम करीत होती.या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयिताच्या मंगळवार पेठ (मठ) घरातून पोलिसांनी एक तलवार, डीव्हीआर, संगणक सीपीयू, कागदपत्रे, आदी साहित्य जप्त केले.

संशयित फडणीस याने अनेक दाम्पत्यांना दोघांना एकमेकांपासून धोका आहे, असे सांगून विभक्त राहण्यास भाग पाडले व त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. याबाबत घटनास्थ‌ळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फडणीस हा स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्याचा मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. तिथे तो भक्तांना आपल्या अंगात स्वामी समर्थ आणि साईबाबा संचारतात असे सांगत असे. नियमित येणाऱ्या भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला व त्यातून गोशाळा व अन्य कामांसाठी वेळोवेळी पैसे घेतले.

फसवणूक झालेल्यांमध्ये ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दीक्षित, रेणुका अरविंद चिंगरे, विद्या गिरीश दीक्षित, केदार शिरीष दीक्षित, रूपा किशोर बाजी, दीपा नारायण बाजी, शहाजी हिंदूराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मीनाक्षी मिलिंद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी (सर्व रा. मंगळवार पेठ व देवकर पाणंद परिसर) या भक्तांचीही अशाच प्रकारे फसवणूक करून त्यांनाही या संशयिताने लुबाडले आहे.या फसवणुकीविरोधात नंदगांवकर यांच्या मुख्य फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा सन २०१३ चे कलम २ (१) (बी) (५) (८) प्रमाणे भारतीय दंडविधान कलम ४२०, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेचा तपास फौजदार योगेश पाटील हे करीत आहेत.चक्क देवच अंगात संचारला...!स्वामी समर्थ व साईबाबांचे कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्या मंदिरात जाऊन भाविकांना मानसिक शांतता मिळते. कित्येक भाविक असे आहेत की, सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. कोणत्याही संकटात स्वामी आपल्या पाठीशी राहतात अशी श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे.

भाविकांच्या या श्रद्धाळूपणाचा या भोंदूंनी गैरफायदा घेतला आहे. स्वामी समर्थ असतील किंवा साईबाबा; हे काही कधी कुणाच्या अंगात येत नाहीत; परंतु या भोंदूंनी ते अंगात संचारतात असे सांगून व देवच आपल्या मुखातून बोलतात, असे भासवून फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर