शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:31 IST

जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल

ठळक मुद्देस्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूकमहिलेसह तिघांना अटक :कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : आपल्या मुखातून साक्षात स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून संदीप प्रकाश नंदगांवकर (वय ३८, व्यवसाय : व्यापार, रा. ७४१/२, सुबल रेसिडेन्सी, देवकर पाणंद) या भक्तांकडून फ्लॅट, मठ व राधानगरी येथील गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल झाली.

या प्रकरणी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस (४४, रा. १७३१/३८, बी वॉर्ड, सिद्धाळ‌ा गार्डनमागील परिसर, मंगळवार पेठ), श्रीधर नारायण सहस्रबुद्धे (५५, रा. प्लॉट नं. ६१, सासने बिल्डिंग, चौथा बसस्टॉप, फुलेवाडी), सविता अनिल अष्टेकर (३५, रा. मंगळवार पेठ) या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. या तिघांविरुद्ध आतापर्यंत १२ लोकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत.

किमान तीन कोटी ८६ लाख ६६ हजार ९९० रुपये रोख व कर्ज काढून आणि नऊ लाख ६७ हजारांचे सोन्याचे दागिने अशी एकत्रित तीन कोटी ९६ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. श्रीधर सहस्रबु्द्धे हा फडणीस याचा गुरू आहे व सविता अष्टेकर ही महिला मठातील सेवेकरी आहे. ती पतीपासून विभक्त राहून हे काम करीत होती.या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयिताच्या मंगळवार पेठ (मठ) घरातून पोलिसांनी एक तलवार, डीव्हीआर, संगणक सीपीयू, कागदपत्रे, आदी साहित्य जप्त केले.

संशयित फडणीस याने अनेक दाम्पत्यांना दोघांना एकमेकांपासून धोका आहे, असे सांगून विभक्त राहण्यास भाग पाडले व त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. याबाबत घटनास्थ‌ळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फडणीस हा स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्याचा मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. तिथे तो भक्तांना आपल्या अंगात स्वामी समर्थ आणि साईबाबा संचारतात असे सांगत असे. नियमित येणाऱ्या भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला व त्यातून गोशाळा व अन्य कामांसाठी वेळोवेळी पैसे घेतले.

फसवणूक झालेल्यांमध्ये ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दीक्षित, रेणुका अरविंद चिंगरे, विद्या गिरीश दीक्षित, केदार शिरीष दीक्षित, रूपा किशोर बाजी, दीपा नारायण बाजी, शहाजी हिंदूराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मीनाक्षी मिलिंद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी (सर्व रा. मंगळवार पेठ व देवकर पाणंद परिसर) या भक्तांचीही अशाच प्रकारे फसवणूक करून त्यांनाही या संशयिताने लुबाडले आहे.या फसवणुकीविरोधात नंदगांवकर यांच्या मुख्य फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा सन २०१३ चे कलम २ (१) (बी) (५) (८) प्रमाणे भारतीय दंडविधान कलम ४२०, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेचा तपास फौजदार योगेश पाटील हे करीत आहेत.चक्क देवच अंगात संचारला...!स्वामी समर्थ व साईबाबांचे कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्या मंदिरात जाऊन भाविकांना मानसिक शांतता मिळते. कित्येक भाविक असे आहेत की, सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. कोणत्याही संकटात स्वामी आपल्या पाठीशी राहतात अशी श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे.

भाविकांच्या या श्रद्धाळूपणाचा या भोंदूंनी गैरफायदा घेतला आहे. स्वामी समर्थ असतील किंवा साईबाबा; हे काही कधी कुणाच्या अंगात येत नाहीत; परंतु या भोंदूंनी ते अंगात संचारतात असे सांगून व देवच आपल्या मुखातून बोलतात, असे भासवून फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर