शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मॉन्सूनपूर्व सरींचा कोल्हापूरला तडाखा, तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:38 IST

Rain Kolhapur : ढगांच्या गडगडासह आलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही.

ठळक मुद्देमॉन्सूनपूर्व सरींचा कोल्हापूरला तडाखातासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी : शिवारे पाण्याने तुंबली

कोल्हापूर : ढगांच्या गडगडासह आलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही.

धुवांधार पावसामुळे भरदुपारी सर्वत्र अंधार दाटल्याने वाहनाधारकांवर हेडलाईट लावून वाहने चालवण्याची वेळ आली. मोठ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंती पडून तीन मजूर मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटनाही घडली.गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होत होते, पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारीदेखील सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी दोननंतर वातावरण बदलू लागले. काळ्याभोर ढगांची आकाशात गर्दी वाढली आणि बघता बघता पावनेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक असणाऱ्या पावसाने नंतर वेग पकडला आणि धुवांधार बरसण्यास सुरुवात केली.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की क्षणात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. पावसाच्या माऱ्यामुळे भर दुपारी अंधार पसरला. वाहनधारकांना हेडलाइट चालवून वाहने हाकावी लागली. चारनंतर पावसाचा जोर कमी झाला पण विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट कायम होता. संध्याकाळपर्यंत तुरळक पाऊस सुरूच होता.जोरदार आलेल्या या पावसामुळे ओढे, नाल्यांना ओहळ आले. शहरातील जयंती नालाही ओव्हरफ्लो होऊन धबधब्यासारखा कोसळू लागला. शहरात अनेक घरात पाणी शिरल्याने पाऊस थांबल्यानंतर पाणी उपसण्याचे काम सुरु झाले. अजूनही बऱ्याच घरात पावसाळ्यापुर्वीची घरांची डागडुजी व शेकारणीची कामे लॉकडाऊनमुळे पूर्ण झालेली नाहीत. पावसाचा अंदाज आल्याने अनेक जण निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री टाकण्याची घाईगडबड करताना दिसत होते. तरीदेखील पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे गळती लागलीच. पाऊस थांबल्यानंतर साचलेले पाणी बाहेर काढण्याची कसरत करावी लागली. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर