शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापुरात पावसाचे दमदार पुनरागमन, राधानगरीचे दोन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:25 IST

पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. डोंगरी तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिकोत्रा धरण शंभर टक्के भरले असून काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाचे दमदार पुनरागमनराधानगरीचे दोन दरवाजे उघडले: भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

कोल्हापूर: पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. डोंगरी तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिकोत्रा धरण शंभर टक्के भरले असून काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.गणेशाच्या आगमनाबरोबरच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. दोन दिवसापासून रिपरिप पडणाºया पावसाने बुधवारपासून मात्र जोर धरला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत असून हवेतही गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २७६ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक ८४ मिलीमीटर पाऊस एकट्या गगनबावडा तालुक्यात झाला आहे. हातकणंगले सर्वात कमी ३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत चालली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणातून विसर्ग सुरु असल्याने पाणीपातळी वाढत असून असाच जोर राहिल्यास सर्वच १४ नद्या पुन्हा एकदा पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.पंधरा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने आगमन केल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. अतिवृष्टी आणि महापुरानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने माळरानासह बागायती पट्ट्यातील पिकेही करपू लागली होती. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेषता महापुराच्या तडाख्यातून वाचलेली भूईमुग आणि भात या पिकांना या पावसाची नितांत आवश्यकता होती. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर