शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सेवामार्गावर खड्डेच खड्डे, मोडतेय कंबरडे; पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 11:59 IST

शिये फाटा, शिरोली, टोप येथील धोकादायक चित्र : वाहनधारकांतून संताप

सतीश पाटीलशिरोली : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सहापदरी होत आहे, यासाठी जवळपास ४,५०० कोटींचा निधी खर्च होत आहे; पण सेवामार्गांचे काय, सेवामार्गावर दीड- दोन फूट खोल खड्डे पडले असून, ते पाण्याने भरलेले आहेत. यामुळे सेवामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. शिये, पुलाची शिरोली, टोप येथील हे धोकादायक चित्र असून, याकडे राष्ट्रीय महामार्गाकडे ठेकेदाराने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. वाहनधारकांतून याबद्दल संताप व्यक्त होत आहे.केंद्र शासनाने कागल ते सातारा सहापदरीकरण रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले आहे; पण या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना स्थानिक वाहतुकीसाठी सेवामार्ग आहेत. या सेवामार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिये फाटा, एमआयडीसी पहिला फाटा, मयूर फाटा, शिरोली फाटा, गोकुळ शिरगाव, अशा बऱ्याच ठिकाणी सेवामार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे उन्हाळ्यातच पडले असून, ठेकेदाराने हे दुरुस्ती करणे गरजेचे होते; पण ते साधा मुरूम टाकूनसुद्धा भरले नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर हेच खड्डे पाण्याने भरले असून, त्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. या खड्ड्यांतून वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक झाले आहे.शिरोली एमआयडीसी येथे येणारे कामगार, स्थानिक लोक, शेतकरी या सेवामार्गाचा वापर करतात. या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. सेवा रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे तात्काळ भरावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.सेवामार्गावर खड्डे पडलेले ठिकाणशिये फाटा : महामार्गाला लागून असणारा शिये फाटा सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. शिये फाटा पश्चिम बाजूस सेवामार्गाची चाळण झाली आहे. कोल्हापूर, शिये, भुये, निगवे, वडणगेसह इतर ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. याठिकाणी नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. एमआयडीसीतील कामगारांना रात्रीचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो.एमआयडीसी पहिला फाटा : याठिकाणी भुयारी मार्गासमोर रस्त्यात मधोमध दोन फूट खड्डा पडला आहे. औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हा महत्त्वाच्या रस्ता आहे.शिरोली फाटा : भुयारीमार्गाच्या खाली खड्डे पडल्याने या भुयारीमार्गाला तळ्याचे रूप आले आहे. यामुळे दुर्गंधी सुटली आहे. ड्रेनेज आणि खड्डे एकच झाले आहेत.टोप कासारवाडी : टोप येथील भुयारीमार्गात तर संपूर्ण खड्डे पडले आहेत. यातून वडगाव, आष्टा आदी ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. यातून तर जाताच येत नाही.

जीव गेल्यावर खड्डे भरणार?शिये फाट्यावरील सेवामार्गावरून महामार्गावर जाताना रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या महिन्यापासून ‘जैसे थे’ आहेत. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावर अंधार आणि खड्डे, तसेच पावसाचे पाणी असल्यामुळे रस्त्याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे जीव गेल्यावर खड्डे भरणार का? असा प्रश्न वाहनधारकांतून विचारला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग