शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

गडहिंग्लज साखर कारखाना चालवायला देण्यास स्थगिती?, आज निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:53 IST

सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.

राम मगदूमगडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना चालवायला देण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.११जूनला झालेल्या विशेष सभेच्या ठरावाची प्रत हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी  दिले. आज, शुक्रवारी (१७) यासंदर्भात पुढील आदेश होण्याची शक्यता आहे.आर्थिक अडचणीमुळे साखर कारखाना व अर्कशाळा सहयोग/बीओटी/ भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे.त्यासाठी आठवड्यापूर्वी विशेष सभा घेण्यात आली. सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.परंतु, त्याला विरोध असणाऱ्या सभासदांचे मत विचारात न घेतल्यामुळे संतप्त सभासदांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांना काही काळ घेराव घातला होता.दरम्यान, बाळगोंडा नाईक यांच्यासह चार सभासदांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती.कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणुकीनंतरच कारखाना चालवायला देण्याचा निर्णय घेतला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.गुरुवारी(१६) न्यायमूर्ती माधव जामदार व आर.डी.धनुका यांच्यासमोर सुनावणी झाली.अॅड.शैलेंद्र कानेटकर यांनी सभासदांची तर सरकारी वकील पी.जी.सावंत यांनी प्रशासकांची बाजू मांडली.

न्यायालयाचा आदेश असा

  • कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना प्रशासकांना असा धोरणात्मक निर्णय घेता येवू शकत नाही.
  • शुक्रवारी (१७)विशेष सभेतील ठरावाची प्रत न्यायालयात हजर करावी.
  • पुढील आदेशापर्यंत विशेष सभेतील ठरावाची अंमलबजावणी/ कार्यवाही करु नये.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने