शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कुरघोड्या पुन्हा सुरू

By admin | Updated: August 1, 2015 00:35 IST

इचलकरंजी नगरपालिका : स्मार्ट सिटी शहराचा विकास बाजूला पडण्याची भीती

इचलकरंजी : नगरपालिकेच्या सभेमध्ये उपनगराध्यक्षांना सभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यावरून उडालेल्या गोंधळावरून राजकीय कुरघोड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. परिणामी स्मार्ट सिटी, शहराचा विकास, नागरी सेवा-सुविधांचा विषय बाजूला पडण्याची भीती व्यक्त होत आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले. कॉँग्रेसने राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडी केली आणि त्याप्रमाणे तीन वर्षे कारभार चालला. पहिल्या अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला असे आरक्षित झाले. नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेविका इच्छुक असल्याने प्रत्येकीला पाच महिने याप्रमाणे सहाही नगरसेविकांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रथम शुभांगी बिरंजे नगराध्यक्षा झाल्या.नगराध्यक्षा बिरंजे यांचा कालावधी डिसेंबरमध्ये संपत असतानाच त्यांनी राजीनामा न देण्याचा पवित्रा घेऊन बंड केले. राजकीय कुरघोडी करण्याची संधी मिळाल्याने ‘शविआ’ ने व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने नगराध्यक्षांच्या बंडाला पाठिंबा दिला. नगराध्यक्षांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अविश्वास आणता येत नाही, असा कायदा असल्याने कॉँग्रेसनेही नंतर नगराध्यक्षांना सहकार्य करण्याचे ठरविले. नगराध्यक्षा बिरंजे यांचा एक वर्षाचा कालावधी १५ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने आठवडाभर आधीपासून अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे नगराध्यक्षा व ‘शविआ’च्या गोटामध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये नगराध्यक्षा सभागृहाबाहेर जाताना उपनगराध्यक्षांऐवजी ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांना सभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. याचा जाब कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना विचारला आणि त्यावरून सभागृहामध्ये रणकंदन माजले. सभेमध्ये उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत नगराध्यक्षांनी सभा संपवून त्यावेळी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना पुन्हा जाब विचारला असता कॉँग्रेस व ‘शविआ’च्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडून धक्काबुक्की झाली.नगरपालिकेच्या सभेतील उडालेला गोंधळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकाराबद्दल १६ जुलै रोजी नगराध्यक्षांनी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व नगरसेवक भीमराव अतिग्रे यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाचा अहवाल नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मागविला आहे. (प्रतिनिधी)विकास खुंटणार काय ?२९ जुलै रोजी उपनगराध्यक्ष जाधव व काँग्रेसचे पक्षप्रतोद पाटील यांनी नगराध्यक्षा बिरंजे, ‘शविआ’चे पक्षप्रतोद जाधव, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पोवार, गटनेते महादेव गौड व मदन झोरे यांनी त्याच सभेमध्ये गोंधळ घातल्याबद्दल त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे. यामुळे आता राजकीय कुरघोड्यांना पुन्हा ऊत येणार का, अशीच चर्चा नागरिकांत आहे. अशा शह-काटशहाच्या राजकारणामुळे स्मार्ट सिटी आणि शहराचा विकास मागे पडतो की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.